शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

अंबाजोगाईत पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना ...

ठळक मुद्देकुटुंबियांनी समजूत घालूनही उचलले टोकाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पेपर अवघड गेल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची समजूत घातली होती. परंतु तरीही त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, अभ्यासाचा ताण, परीक्षा अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.समीर सतीश ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समीर हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सध्या बारावीची परीक्षा सुरु आहेत. २८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर झाला. वर्षभर अभ्यास केला. परंतु तरीही रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने समीर अस्वस्थ झाला होता. ही बाब अनेकदा त्याने आपल्या घरी देखील बोलून दाखविली. आपला मुलगा पेपर अवघड गेल्याने तणावात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला धीर दिला. त्याची समजूत घातली. घरच्यांनी समजूत घालूनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही.वारंवार पेपर अवघड गेल्याचे त्याच्या डोक्यात होते. यातूनच त्याने त्याने मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरात कोणीच नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतीश ठाकूर यांचा समीर हा कनिष्ठ मुलगा होता.दरम्यान, मुले तणावाखाली आहेत का? त्यांच्या वागण्यात काही बदल जाणवतोय का, यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.धावपळीच्या जीवनात पालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने आणि त्यांना वेळ दिला जात नसल्याने ते एकाकी पडत आहेत. त्यामुळेच त्यांना आपल्या अडचणी कोणासमोर मांडाव्यात, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळेच ते टोकाचे पाऊल उचलतात.आत्महत्येचे सत्र सुरूच : कक्ष स्थापन करादहावी, बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ८ ते १० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जीवन संपविले आहे. विद्यार्थी आत्महत्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनालाच काही तरी पाऊल उचलण्याची गरज आहे. तणाव आणि नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांनीही खचून न जाता नैराश्य आल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेणे गरजेचे आहे.