शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

अंबाजोगाईत पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना ...

ठळक मुद्देकुटुंबियांनी समजूत घालूनही उचलले टोकाचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पेपर अवघड गेल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची समजूत घातली होती. परंतु तरीही त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, अभ्यासाचा ताण, परीक्षा अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.समीर सतीश ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समीर हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सध्या बारावीची परीक्षा सुरु आहेत. २८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर झाला. वर्षभर अभ्यास केला. परंतु तरीही रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने समीर अस्वस्थ झाला होता. ही बाब अनेकदा त्याने आपल्या घरी देखील बोलून दाखविली. आपला मुलगा पेपर अवघड गेल्याने तणावात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला धीर दिला. त्याची समजूत घातली. घरच्यांनी समजूत घालूनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही.वारंवार पेपर अवघड गेल्याचे त्याच्या डोक्यात होते. यातूनच त्याने त्याने मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरात कोणीच नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतीश ठाकूर यांचा समीर हा कनिष्ठ मुलगा होता.दरम्यान, मुले तणावाखाली आहेत का? त्यांच्या वागण्यात काही बदल जाणवतोय का, यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.धावपळीच्या जीवनात पालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने आणि त्यांना वेळ दिला जात नसल्याने ते एकाकी पडत आहेत. त्यामुळेच त्यांना आपल्या अडचणी कोणासमोर मांडाव्यात, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळेच ते टोकाचे पाऊल उचलतात.आत्महत्येचे सत्र सुरूच : कक्ष स्थापन करादहावी, बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ८ ते १० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जीवन संपविले आहे. विद्यार्थी आत्महत्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनालाच काही तरी पाऊल उचलण्याची गरज आहे. तणाव आणि नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांनीही खचून न जाता नैराश्य आल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेणे गरजेचे आहे.