शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

एसटीचे ‘सीमोल्लंघन;’ प्रवासी नसल्याने तोटा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुळे अनेक दिवस बंद असलेली एसटीची दौड आता सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनामुळे अनेक दिवस बंद असलेली एसटीची दौड आता सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली असून, प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अजूनही बीड एस.टी. तोट्यात आहे. मुश्किलीने डिझेलचे पैसे निघत आहेत. तरीदेखील एस.टी. महामंडळाकडून सेवा जवळपास सर्व ठिकाणी सुरू ठेवलेली आहे.

जिल्ह्यातून ग्रामीण भागात तसेच परजिल्ह्यांत बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसफेऱ्या प्रवासी संख्येनुसार बदलल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे त्यामुळे अनेक राज्यांत जाणारी बससेवा बंद करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे सर्व ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला होता. अद्यापदेखील चार वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याचा फटकाही बस प्रवाशांना बसत आहे. परराज्यांत जाणाऱ्या बसची संख्या फक्त एक आहे. ही बस अंबाजोगाई ते हैदराबाद अशी जाते. दरम्यान, मुंबई-पुणे व औरंगाबाद या शहरांत जाण्यासाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मात्र, गैरसोय होत असून, खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. एस.टी.ला या काळात तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गरजेनुसार बसफेऱ्या सुरू असल्याचे बीड विभागाकडून सांगण्यात आले.

...

विभाग तोट्यातच

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात पुन्हा दुपारी चार वाजल्यानंतर संचारबंदीचे निर्बंध कायम आहेत. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळत आहेत. प्रवासी घटल्याने सर्वच आगारांतील एस.टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा एस.टी. महामंडळाला आहे.

...

बीड-पुणे-मुंबई फेऱ्या वाढल्या

लॉकडाऊन उघडल्यानंतर बससेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, मुंबई व पुणे या ठिकाणी कामानिमित्त असलेला मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्या वाढविण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांचादेखील या मार्गावर चांगला प्रतिसाद आहे.

......

औरंगाबाद येथे जाणाऱ्यांची संख्याही चांगली असल्यामुळे दोन्ही शहरांतून विनावाहक बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या फेऱ्या प्रवासी संख्येनुसार कमी-जास्त केल्या जात आहेत.

प्रवासीसंख्या कमी असल्याने शिवशाही बस बंद ठेवण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे. तर, प्रवासी संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

...

परराज्यांत फक्त एक बस

कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश यांसह इतर राज्यांत बससेवा सुरू होती. दरम्यान प्रवासी नसल्याने फक्त अंबाजोगाई ते हैदराबाद ही एकच परराज्यांतील बस सुरू आहे. तिलादेखील म्हणावा तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नाही. पुढील काळात पूर्वपदावर परिस्थिती आल्यानंतर सर्व राज्यांतील बससेवा सुरळीत करण्यात येणार आहे.

....

जिल्ह्यातील एकूण आगारे -०८

आगारातील एकूण बसेस - ५४८

सध्या सुरू असलेल्या बसेस - ३९८

रोज एकूण फेऱ्या ४१०

दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस ०१