शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

समृद्ध गावासाठी प्रशासनाने दिले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST

धारूर : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित ‘ समृद्ध गाव समृद्ध संवाद’ उपक्रमात ...

धारूर

: पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत आयोजित ‘ समृद्ध गाव समृद्ध संवाद’ उपक्रमात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी तालुक्यातील १२ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत गाव समृद्ध करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून बळ दिले.

या उपक्रमात संतोष शिनगारे यांनी वॉटर कप स्पर्धेत केलेल्या कामांबद्दल गावांचे कौतुक करून समृद्ध गाव स्पर्धेचा आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आढावा मांडला. येत्या २५ फेब्रुवारीअखेर १२० गुणांच्या अनुषंगाने काम करण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी ग्रामस्थांशी ओळख करून घेत त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या.

यावेळी नरेगा कृती आराखडा व काही कामे वाढवून पुरवणी कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. वॉटर बजेटमधील तूट भरून काढणे,ई-पीक पाहणी पद्धतीबदल सविस्तर माहिती दिली. त्यानुसार आपल्या गावातील शेतात जाऊन सर्वानी आपले पिके त्या अप्लिकेशनमध्ये नोंदवण्याची त्यांनी सूचना केली. गावातील राहिलेली जलसंधारणाची कामे करावीत, तलावातील गाळ काढण्यासाठी, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण,बांधबंदिस्तीसाठी प्रशासनाच्या वतीने जेसीबी उपलब्ध करून देण्यात येईल, गावकऱ्यांनी फक्त डिझेलची व्यवस्था करावी. त्या अनुषंगाने अर्ज, प्रस्ताव नरेगा विभागात द्यावेत, असे या संवादात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पोखरा योजनेतून लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत अशाही सूचना दिल्या. प्रत्येक पीक निहाय फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तसेच सुगंधी तेलाच्या व औषधी वनस्पती, मत्स्य पालन, मधुमक्षिका पालन , अशा व्यवसायास सुरुवात करावी, असे आवाहन केले.

पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे,तालुका समन्वयक नितीन पाटोळे यांनी बैठकीचे नियोजन केले.

टँकर बंद, फळबागा वाढल्या

आमला, देवठाणा,हिंगणी बू, शिंगणवाडी, व्हरकवाडी, अंजन डोह, मोरफळी, कारी, आंबेवड गाव, खोडस, कोळ पिंपरी, जायभायवाडी येथील सरपंच व जलमित्रांनी वाॅटरकप स्पर्धेतील प्रवास जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडला. अनेक गावातील टँकर बंद झाले. फळबागांचे क्षेत्र वाढवल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.

मनसंधारणातून जलसंधारण

समृद्ध गावमधील श्रमदान करून गावातील गट तट नष्ट केले व मनसंधारणातून जलसंधारण व जलसंधारणाच्या माथ्यावरच्या उपचाराबरोबरच गावातील लोकांच्या मनावर व माथ्यावर उपचार करुन गाव टँकरमुक्त केले,समृद्ध गावही नक्कीच करू, असा विश्वास देत जिल्ह्यधिकाऱ्यांनी या गावांचे कौतुक केले.

सकारात्मक उर्जा

नवीन वर्षात पदार्पण करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाने एक सकारात्मक शक्ती,ऊर्जा मिळाली आहे. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांगले काम केले. गाव पाणीदार झाल्यास जेवढा आनंद आम्हाला झाला तेवढाच आनंद तीन तास जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून झाला. याची फलश्रुती ग्रामस्थ लवकरच आपल्या कामातून दाखवून देतील. -- शेषेराव गडदे, सरपंच,मोरफळी.