शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

लसच उपाय; लसीकरणानंतर आतापर्यंत एकही मृत्यू नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु लसीचा तुटवडा जाणवत आहे. ती उपलब्ध करण्यासाठी ...

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु लसीचा तुटवडा जाणवत आहे. ती उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आतापर्यंत लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लसच उपाय असल्याचे दिसते.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९५ हजार ७७५ लाेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. पैकी १ लाख ६४ हजार ६७३ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ३१ हजार १०२ लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच आतापर्यंत १५ हजार ४६७ हेल्थकेअर वर्कर्स, २५ हजार ५४८ फ्रंटलाइन वर्कर्स, ९० हजार १०९ सिनीयर सिटीझन, ३३ हजार ५४९ कोमॉर्बिड आजार असलेल्या लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का ८२ असून, शहरातील ८३ आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही लस घेण्यासाठी लोक पुढे येत असून, आतापर्यंत ८ हजार ४९४ लोकांनी लस घेतली आहे. आता १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे.

पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ दोन टक्के पॉझिटिव्ह

n पहिला डोस घेतल्यानंतर जिल्ह्यात जवळपास ५० लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याचा टक्का केवळ २ आहे.

n विशेष म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार हेदेखील कोरोनाबाधित आढळले होते. त्यांनी थोडे लक्षणे जाणवल्याने ॲन्टिजन तपासणी केली होती. १० दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले होते.

n डोस घेतला तरी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

लस महत्त्वाचीच; मृत्यूचा धोका कमी

कोरोना लस पूर्णपणे सुरक्षा देते याचा दावा केला जात नसला तरी डोस घेतल्यानंतर अद्याप एकाही मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झालेली नाही. यावरून लस ही महत्त्वाची असून, सर्वांनी मनातील सर्व गैरसमज दूर करून लस घेणे गरजेचे आहे.

दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ बोटावर मोजण्याइतकेच बाधित

कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही जवळपास ५ ते १० लोक बाधित आढळल्याची शक्यता आहे. याची नोंद आरोग्य विभागाकडे वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे दुसरा डोस घेतल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेचे एक पदाधिकारीदेखील बाधित आढळले होते. परंतु त्यांना जास्त त्रास झाला नसल्याचे सांगण्यात आले.

सुरुवातीला काही दिवस लोकांच्या मनात गैरसमज होते. परंतु आता ते जवळपास दूर झाल्याने लोक स्वत:हून पुढे येत आहेत. आतापर्यंत तरी दुसरा डोस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद आपल्याकडे झालेली नाही. त्यामुळे लस हाच पर्याय असून, सर्वांनी ती घ्यावी.

- डॉ. आर.बी. पवार, डीएचओ, बीड