शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दर सहा हजारांवर; शेतकरी म्हणतात, आता काय करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

प्रभात बुडूख/ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात सोयाबीन काढणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतात ...

प्रभात बुडूख/

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात सोयाबीन काढणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असून भाव गडगडल्याने शेतकरी चिंतेत आहे. हा दर सरासरी प्रतिक्विंटल ४ ते ५ हजारांनी कमी होऊन ५ ते ६ हजार रुपये इतका कमी झाला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव कमी मिळणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

जिल्ह्याचे मुख्य पीक कापूस हे होते. दरम्यान, सोयाबीनचे उत्पादन व मिळणारा भाव यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यामुळे कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. मागील महिन्यात ११ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, सोयाबीन काढणीला येताच त्याचा भाव घसरला आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. दरम्यान, सोयाबीन काढणीला आलेले असताना जिल्ह्यात सर्वदूर संततधार व काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून राहिलेले आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. नैसर्गिक संकट व भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

...

सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)

२०१७ ८२०००

२०१८ ९८०००

२०१९ १२००२१

२०२१ २८४७४८

...

सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल

जानेवारी २०२० ४२७०

जून २०२० ३६७०

सप्टेंंबर २०२० ३६५०

जानेवारी २०२१ ४२१०

जून २०२१ ७९०० ते १००००

सप्टेंबर २०२१ ६२००

...

पाण्यासारखा पैसा ओतला आता काय करू?

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करीत आहे. मागील वर्षी निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली होती. यावर्षी चांगला भाव येईल या हिशेबाने जास्तीचा खर्च केला आहे. मात्र, सोयाबीन काढणीला आल्यानंतर लगेचच भाव पडतो. त्यामुळे खर्च केलेला पैसा निघतो की नाही हे देखील माहिती नाही. त्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनवर परिणाम झाला आहे.

-सुनील खंडागळे, शेतकरी

...

कापूस पिकाची लागवड कमी करून यंदा सोयबीनचा पेरा वाढविला होता. फवारणी व काढणीपर्यंत एकरी ४ ते ४५०० रुपये खर्च होतो. त्या तुलनेत यावर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भाव पडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धोका झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्तीचे पडावेत अशी केंद्र व राज्य सरकारची भावना नाही.

-अशोक जगताप, शेतकरी

...

विकण्याची घाई करू नका

ज्यावेळी सोयाबीन काढणी होते, त्यावेळी तातडीने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकण्याची घाई करू नये. योग्य भाव आल्यानंतर घरातील सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणावे

-अडत व्यापारी

..

बाजारात सोयाबीनची होणारी आवक यावर भाव ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन विक्रीसाठी आणल्यानंतर चांगला भाव मिळतो. बाजारातील अंदाज घेत सोयाबीन विक्री करणे शेतकऱ्यांना परवडेल.

-अडत व्यापारी