शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

खरबुज लगडताच कोरोनाचा फटका, पाच रुपये किलोचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:29 IST

सखाराम शिंदे गेवराई : उन्हाळ्यात चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने खरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील धोंडराई ...

सखाराम शिंदे

गेवराई : उन्हाळ्यात चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने खरबूज लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील धोंडराई येथील शेतकऱ्याने दोन लाख रुपये खर्च करून जानेवारी महिन्यात आपल्या पाच एकर जमिनीत खरबुजाची लागवड केली. ते काढणीला आले असता कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाजार बंद आणि मागणी घटल्याने पाच रुपये किलोचा भाव मिळत आहे.

तालुक्यातील धोंडराई येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या पाच एकर शेतात जानेवारीमध्ये खरबुजाची लागवड केली. मलचिंग, रोपे, खते, मशागत असा तब्बल दोन लाखांचा खर्च करून खरबुजाची जोपासना केली. मात्र, आता खरबूज मोठ्या प्रमाणात लगडले व काढणी सुरू झाली असताना कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाजार बंदचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. परिणामी खरबुजाला मागणी कमी झाली आहे. ठोक बाजारात चार ते पाच रुपये किलो कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे झालेला खर्च निघणे मुश्किल झाले आहे. शिंदे यांनी गतवर्षी डाळिंबाची लागवड केली होती. त्यावेळीही कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. डाळिंब कवडीमोल भावाने विकावे लागले. झालेला खर्च निघाला नव्हता. यंदा तरी चांगले उत्पन्न काढता येईल, अशी आशा होती. ती फोल ठरत असल्याचे शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी लोकमतला सांगितले.

===Photopath===

140321\14bed_6_14032021_14.jpg~140321\14bed_5_14032021_14.jpg

===Caption===

गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील शेतकऱ्याने दोन लाख रूपये खर्चुन खरबुजांची लागवड केली, मात्र बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे.