शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घनकचरा प्रकल्पात प्रक्रियेऐवजी जाळला जातोय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST

माजलगाव : काही महिन्यांपासून शहरातील कचरा संकलित करून तो केसापुरी येथील घनकचरा प्रकल्पात आणला जातो. त्यावर ...

माजलगाव : काही महिन्यांपासून शहरातील कचरा संकलित करून तो केसापुरी येथील घनकचरा प्रकल्पात आणला जातो. त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी तो २-३ दिवसांनी जाळला जातो. त्याच्या धुराच्या प्रदूषणामुळे व दुर्गंधीमुळे या प्रकल्पालगत असलेल्या तीन गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

माजलगाव नगरपालिका शहरातील कचरा गोळा करून तो सिंदफना नदीच्या काठी टाकण्यात येत असे. हा कचरा नदीकाठी टाकला जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष मीरा प्रकाश आनंदगावकर यांच्या काळात केसापुरी येथील पाच एकर जागेत घनकचरा प्रकल्प उभारण्याचे ठरले. त्यानंतर संरक्षक भिंत व सिमेंट रस्ते बांधण्यात आले. परंतु, या जागेत कचराच आणून टाकला जात नसे. तो कचरा सिंदफना नदीपात्राच्या काठी व बायपासला कोठेही टाकण्यात येत असे.

परंतु मागील ४-५ महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचा सर्व कचरा घनकचरा प्रकल्पात आणून टाकला जात आहे. तसेच दर दोन- तीन दिवसानंतर तो कचरा पेटविला जातो. हा जाळलेला कचरा धुमसत राहतो. त्यातून प्रदूषणयुक्त धूर व दुर्गंधी सुरूच राहते. परिणामी, या प्रकल्पालगत असलेल्या केसापुरी,भाटवडगाव व मंगरूळ या तीन गावांतील रहिवाशांना दुर्गंधी व प्रदूषणाचा सामना करावा लागतो आहे.

यामुळे अनेक नागरिकांना दमा, श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच प्रकल्पाच्या पश्चिमेला ३३ के.व्ही.विद्युत उपकेंद्र असून त्यासही एखाद्या वेळी धोका निर्माण होऊ शकतो. तर याच प्रकल्पाच्या समोरून खामगाव - पंढरपूर ५४८ सी हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तरीही याकडे नगरपालिकेचे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसत आहे.

घनकचरा प्रकल्प परिसरात दुर्गंधी व प्रदूषणाबाबत आम्ही अनेकवेळा नगरपालिकेकडे लेखी व तोंडी तक्रार केली. तरीदेखील नगरपालिका याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करताना दिसते. यापुढे या ठिकाणी कचरा जाळल्यास आम्ही हा प्रकल्प बंद करू - विलास साळवे,माजी सरपंच केसापुरी

घनकचरा प्रकल्पाबाबत संबंधित गुत्तेदाराला नगरपालिका नोटीस बजावणार आहे. तरीही त्याने न ऐकल्यास त्याचे टेंडर बंद करण्यात येईल.

-- शेख मंजुर, नगराध्यक्ष, माजलगाव.

===Photopath===

040321\img_20210302_163534_14.jpg