शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

२९ ग्रामपंचायतींमध्ये घनवृक्षलागवड; दोन ठिकाणी औषधी वनस्पतींचे वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

बीड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक प्राणवायू वृद्धीसाठी ‘एक व्यक्ती, तीन झाड’ ...

बीड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक प्राणवायू वृद्धीसाठी ‘एक व्यक्ती, तीन झाड’ या वृक्षलागवड उपक्रमाची जिल्हा परिषदेने जोरदार तयारी केली असून, ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. शुभारंभासाठी १०३१ ग्रामपंचायतीअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान शंभर झाडांची लागवड केली जाणार असून, २९ ग्रामपंचायतींमध्ये पाच गुंठे ते दहा गुंठे क्षेत्रात घनवृक्षलागवड केली जाणार आहे. अशी सुमारे किमान एक लाख दहा हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. यासाठी लागणारी रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग आणि कृषी विभागातील रोपवाटिकेतून ग्रामपंचायतींच्या निधीतून प्राप्त करून घेणार आहेत. जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे माजलगाव, परळी तालुक्यातील नित्रुड, सिरसाळा, गाढे पिंपळगाव आणि टोकवाडी येथे मोहीम शुभारंभास उपस्थित राहणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात तर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे हे बीड, गेवराई, वडवणी तालुक्यात शुभारंभ करणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे अंबाजोगाई आणि धारूर येथील शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सर्व निसर्गप्रेमी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांनी जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण शुद्धतेसाठी सहभाग नोंदवा

पर्यावरण शुद्धतेच्या कामात सर्वांनी हातभार लावावा तसेच स्वतः रोपे लावावीत अथवा ग्रामपंचायतीला वृक्षरोपे दान स्वरूपात देण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसट, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

गतवर्षीच्या झाडांचाही वाढदिवस

५ जून रोजी गतवर्षी लावलेल्या झाडांचे आणि घन वृक्षलागवडीचे वाढदिवस साजरे केले जाणार आहेत, तर परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे आयुर्वेदिक वनस्पतींच्या वननिर्मितीचा शुभारंभ होणार आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथे पेरू वन, तर गिरवली आपेट येथे औषधी वनस्पती लागवड आणि घनवृक्षलागवड केली जाणार आहे.

अकरा संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्ह्यातील या वृक्षलागवड मोहिमेसाठी जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक तालुक्यासाठी आणि गावासाठी एक याप्रमाणे अकरा संपर्क अधिकारी नियुक्त केले असून, त्यांनी गावात कार्यक्रमात उपस्थित राहून वृक्षलागवड करणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या केलेल्या कामाचा अहवाल सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर होणार आहे.

-------