शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

ऊर्ध्व कुंडलिकाने फुलवले बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

वडवणी : उर्ध्व कुंडलिका धरण भरले आणि वडवणी, धारूर तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले. पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच ...

वडवणी : उर्ध्व कुंडलिका धरण भरले आणि वडवणी, धारूर तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले. पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच शिवाय शेतीसाठी पाणीही मिळणार असल्यामुळे ते सुखावले. यावर्षी पहिल्याच्या टप्यात हा प्रकल्प तुडुंब भरून ओसंडून जातोय. तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. वडवणी तालुका हा कायम दुष्काळाच्या खाईत असायचा मात्र अप्पर ऊर्ध्व कुंडलिका धरणामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले आहे.

या प्रकल्पातील प्रकल्पीय पूर्णसाठा क्षमता १८.७७ द.श.घ.मी.असून, जलाशयाची पूर्ण पाणी पातळी ५३७ मीटर आहे. या प्रकल्पातील जिवंत पाणी साठा १५.५७ द.श.घ.मी. असून, ३० जुलै रोजी या धरणात ५३६.३५ पाणीसाठा आहे. तालुक्यातील जवळपास २ हजार ८०० हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव पूर्णक्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. हवामान खात्याच्या इशारानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, या धरणात पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे येणारे पाणी हे कुंडलिका नदीपात्रात सोडावे लागत आहे. याबाबत बीड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय गुजर म्हणाले की, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येणारा येवा कुंडलिका नदीपात्रात सोडावा लागणार आहे. धरणात येणाऱ्या येवा पाहता आजची ५३६.३५ मीटर या पातळीनंतर येणाऱ्या येव्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याबाबत तहसीलदार प्रकाश सिरसेवाड म्हणाले की तलावाची पाहणी केली असून, जवळपास ९० टक्के भरलेले आहे. ९० टक्के धरणाची पातळी ५३६.४५ असून, कधीही पाऊस पडला की धरणातून पाणी सोडले जाईल. नदी काठावरील गावांना, नागरिकांना याबाबत कळविले आहे.

असलेले वरदान ठरलेले ऊर्ध्व कुंडलिका धरण गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या सतत पावसामुळे या धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरणात ३० जुलै रोजी ८९.९५ टक्के पाणीसाठा असून, पूर्णक्षमतेने भरत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा निसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना आणि नदीशेजारी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

310721\rameswar lange_img-20210720-wa0026_14.jpg~310721\rameswar lange_img-20210720-wa0025_14.jpg