शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

सिंदफना, उथळा प्रकल्पातील पाण्याने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अजूनपर्यंत सिंदफना व उथळा मध्यम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अजूनपर्यंत सिंदफना व उथळा मध्यम प्रकल्पात पाण्याचा नव्याने थेंबही जमा झाला नाही. तालुक्यातील नद्या-नालेही कोरडेठाक आहेत. मोठा पाऊस नसल्याने पाणी प्रश्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरूर तालुक्यातील सिंदफना प्रकल्प सर्वांत जुना आहे. त्यानंतर उथळा मध्यम प्रकल्प तयार झाला. या दोन्ही प्रकल्पांशिवाय बेलपारा मध्यम प्रकल्पदेखील तालुक्याला आधारभूत ठरत असतो. गतवर्षी सर्व प्रकल्प ओसंडून वाहत होते. परिणामी, नद्या-नाल्यांनादेखील पाणी दिसत होते. या वर्षीही पाऊस वेळेवर आला खरा, परंतु कुठेच पाणी वाहिले नाही. सध्या शेतशिवार पिकाने हिरवेगार दिसत आहेत. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आता पिकालाही पावसाची गरज भासू लागल्याची स्थिती आहे.

तालुक्यात सिंदफना, उथळा, बेलपारा, घाटशिळा, मोरजळवाडी, उकांडा, वार्णी आदी ठिकाणी लहान-मोठे दहा-बारा जलाशय आहेत. परंतु एकाही जलाशयात पाणी जमा झाले नाही. पाऊस आहे, पण पाणी नाही.. अशी अवस्था असल्याने भविष्यातील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त होत आहे. पावसाच्या नोंदीवरून एकूण टक्केवारीत जवळपास अर्धाच पल्ला गाठला आहे.

....

९ टक्केच पाणीसाठा

सध्या सिंदफना मध्यम प्रकल्पात ९ टक्के पाणीसाठा आहे. नव्याने पाणीपातळीत वाढ झालीच नाही. तीच अवस्था उथळा प्रकल्पाची आहे. याच प्रकल्पावरून शहराला पाणीपुरवठा होत असल्याने हे दोन्ही प्रकल्प भरणे शिरूरकरांसाठी गरजेचे आहे. शहराच्या जवळच असलेला सिद्धेश्वर बंधारादेखील अद्याप कोरडाच आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा पुन्हा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे चित्र सध्या आहे.

310721\img-20210527-wa0051.jpg

फोटो