शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

राजेगाव परिसरात ऊसलागवडीत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन ...

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या भागात ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र ऊसलागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त लागवड होत असल्याने नोंदी घेणे बंद केले असले तरी शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत ऊसलागवडीला जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे पुढील वर्षाच्या गाळप हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावर्षी सुरुवातीच्या व परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले, तलाव, विहीर व बोअरच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली, तसेच गोदावरी गंगेवरील असलेला बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा झाला. जायकवाडी धरण भरल्यामुळे उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाणी उपलब्ध होत असल्याने राजेगावसह परिसरातील शेतकरी हे सध्या ऊस लागवडीकडे वळले आहेत.

राजेगावसह सुर्डी नं., रिधोरी, शेलगावथडी, गव्हाणथडी, वारोळा, गव्हाणथडी याठिकाणी आजपर्यंत एक ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसलागवड झाली असून, लागवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. शेतकरी ८६०३२, ८००५, १०००१, ९८०५, ३१०२ जातीच्या उसाला प्राधान्य देत असून, ५० टक्के या जातीच्या उसाची लागवड केली आहे. तुरळक ठिकाणीच २६५ व २६१ या जातीच्या उसाची लागवड झाली आहे.

अतिरिक्त लागवडीमुळे नोंदी बंद

यावर्षी लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याने कारखान्यांनी पुढील वर्षाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस उभा राहू नये म्हणून कारखान्यांकडून क्षमतेनुसार ऊसलागवडीला प्राधान्य देत नोंदी घेतल्या आहेत. शेतकरी जास्त लागवड करत असल्याने अतिरिक्त ऊसलागवडीच्या नोंदी सध्या तरी घेणे थांबवले आहे.

वातावरणातील बदलामुळे इतर पिकांच्या तुलनेत उसाचे पीक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. यावर्षी खरिपातील कुठलेच पीक हाती लागले नाही. शेतकऱ्यांना तारणारे एकमेव पीक म्हणून उसाकडे पाहिले जात आहे.

-मुकुंद कचरे,

शेतकरी

मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, नगदी पीक असल्याने उसाशिवाय अन्य पर्याय नसल्यामुळे शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत.

-बाळू गरड,

शेतकरी

शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करावा. जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही.

-संगेकर, कृषी अधिकारी