शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राजेगाव परिसरात ऊसलागवडीत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन ...

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या भागात ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र ऊसलागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त लागवड होत असल्याने नोंदी घेणे बंद केले असले तरी शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत ऊसलागवडीला जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे पुढील वर्षाच्या गाळप हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावर्षी सुरुवातीच्या व परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले, तलाव, विहीर व बोअरच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली, तसेच गोदावरी गंगेवरील असलेला बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा झाला. जायकवाडी धरण भरल्यामुळे उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाणी उपलब्ध होत असल्याने राजेगावसह परिसरातील शेतकरी हे सध्या ऊस लागवडीकडे वळले आहेत.

राजेगावसह सुर्डी नं., रिधोरी, शेलगावथडी, गव्हाणथडी, वारोळा, गव्हाणथडी याठिकाणी आजपर्यंत एक ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसलागवड झाली असून, लागवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. शेतकरी ८६०३२, ८००५, १०००१, ९८०५, ३१०२ जातीच्या उसाला प्राधान्य देत असून, ५० टक्के या जातीच्या उसाची लागवड केली आहे. तुरळक ठिकाणीच २६५ व २६१ या जातीच्या उसाची लागवड झाली आहे.

अतिरिक्त लागवडीमुळे नोंदी बंद

यावर्षी लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याने कारखान्यांनी पुढील वर्षाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस उभा राहू नये म्हणून कारखान्यांकडून क्षमतेनुसार ऊसलागवडीला प्राधान्य देत नोंदी घेतल्या आहेत. शेतकरी जास्त लागवड करत असल्याने अतिरिक्त ऊसलागवडीच्या नोंदी सध्या तरी घेणे थांबवले आहे.

वातावरणातील बदलामुळे इतर पिकांच्या तुलनेत उसाचे पीक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. यावर्षी खरिपातील कुठलेच पीक हाती लागले नाही. शेतकऱ्यांना तारणारे एकमेव पीक म्हणून उसाकडे पाहिले जात आहे.

-मुकुंद कचरे,

शेतकरी

मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, नगदी पीक असल्याने उसाशिवाय अन्य पर्याय नसल्यामुळे शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत.

-बाळू गरड,

शेतकरी

शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करावा. जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही.

-संगेकर, कृषी अधिकारी