शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

राजेगाव परिसरात ऊसलागवडीत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन ...

किट्टीआडगाव : दक्षिण भागातून जायकवाडी धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा उजवा कालवा, तर उत्तर भागातून गोदावरी गंगा गेल्यामुळे हा भाग ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. या भागात ऊसलागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मागील दोन वर्षांपासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र ऊसलागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त लागवड होत असल्याने नोंदी घेणे बंद केले असले तरी शेतकरी इतर पिकांच्या तुलनेत ऊसलागवडीला जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे पुढील वर्षाच्या गाळप हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावर्षी सुरुवातीच्या व परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले, तलाव, विहीर व बोअरच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली, तसेच गोदावरी गंगेवरील असलेला बंधाऱ्यात भरपूर पाणीसाठा झाला. जायकवाडी धरण भरल्यामुळे उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाणी उपलब्ध होत असल्याने राजेगावसह परिसरातील शेतकरी हे सध्या ऊस लागवडीकडे वळले आहेत.

राजेगावसह सुर्डी नं., रिधोरी, शेलगावथडी, गव्हाणथडी, वारोळा, गव्हाणथडी याठिकाणी आजपर्यंत एक ते दीड हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसलागवड झाली असून, लागवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. शेतकरी ८६०३२, ८००५, १०००१, ९८०५, ३१०२ जातीच्या उसाला प्राधान्य देत असून, ५० टक्के या जातीच्या उसाची लागवड केली आहे. तुरळक ठिकाणीच २६५ व २६१ या जातीच्या उसाची लागवड झाली आहे.

अतिरिक्त लागवडीमुळे नोंदी बंद

यावर्षी लागवडीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याने कारखान्यांनी पुढील वर्षाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांचा ऊस उभा राहू नये म्हणून कारखान्यांकडून क्षमतेनुसार ऊसलागवडीला प्राधान्य देत नोंदी घेतल्या आहेत. शेतकरी जास्त लागवड करत असल्याने अतिरिक्त ऊसलागवडीच्या नोंदी सध्या तरी घेणे थांबवले आहे.

वातावरणातील बदलामुळे इतर पिकांच्या तुलनेत उसाचे पीक शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. यावर्षी खरिपातील कुठलेच पीक हाती लागले नाही. शेतकऱ्यांना तारणारे एकमेव पीक म्हणून उसाकडे पाहिले जात आहे.

-मुकुंद कचरे,

शेतकरी

मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, नगदी पीक असल्याने उसाशिवाय अन्य पर्याय नसल्यामुळे शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत.

-बाळू गरड,

शेतकरी

शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिंबक सिंचनाचा वापर करावा. जेणेकरून पाण्याची नासाडी होणार नाही.

-संगेकर, कृषी अधिकारी