शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईच्या बसस्थानकात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी सतत माणसामुळे गजबजणाऱ्या बसस्थानकात ...

अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी सतत माणसामुळे गजबजणाऱ्या बसस्थानकात अचानकच निर्मनुष्यता व शुकशुकाट जाणवू लागला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. बससेवा बंद असल्याचा मोठा फटका सामन्य नागरिकांना बसू लागला आहे. ग्रामीण भागातील नागिरकांना रुग्णालयात येण्यासाठीही वाहन उपलब्ध नाही. खासगी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. हक्काचे वाहन असलेली बस वाहतूकही बंद झाल्याने बसस्थानकात शुकशुकाट जाणवू लागला आहे.

पाणपोईची गरज

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे तापमानात वाढ होत चालली आहे. वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. अशास्थितीत वाढत्या उन्हात अत्यावश्यक सेवा देणारी पोलीस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्तासाठी ठाण मांडून आहे. सर्व उपाहारगृह व हॉटेल, टपऱ्या बंद असल्यामुळे कडक उन्हात बंदोबस्त करणाऱ्या पोलीसबांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक परिसर, शिवाजी चौक व शहरातील मुख्य परिसरात पाणपोईची नितांत आवश्यकता आहे.

पाणी आहे पण लाईट गूल, उभी पिके संकटात

अंबाजोगाई : तालुक्यात महावितरणच्या वतीने केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित होतो. जिथे वीज पुरवठा सुरू आहे, तिथे अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे विद्युत पंप चालत नाही. त्यामुळे शेतातील ऊस, भाजीपाला व विविध पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत.

कोरोनाचे संकट व त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिल भरण्याची स्थिती नसताना वीज मंडळाने सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.

प्रोत्साहन रक्कम कधी होणार जमा

अंबाजोगाई : राज्य शासनाने नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. एक वर्ष लोटून गेल्यानंतर अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ती तातडीने जमा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.