शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून पाटोद्यात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

पाटोदा : नळपाणी योजनेच्या कामांमधील पैशाच्या देवणाघेवाणीवरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना पाटोदा शहरात बुधवारी रात्री उशिरा ...

पाटोदा : नळपाणी योजनेच्या कामांमधील पैशाच्या देवणाघेवाणीवरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना पाटोदा शहरात बुधवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी २९ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात २५ जणांविरुद्ध गन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

नळ योजनेतील कामाच्या पैशावरून कंत्राटदार विश्वनाथ हुले व माजी आमदार लक्ष्मण जाधव यांचे पुत्र संतोष जाधव यांच्यात अनेक दिवसापासून मतभेद होते. बुधवारी दुपारी संतोष जाधव हे नळ योजनेतील कामाच्या पैशासाठी हुले यांच्याकडे शहरातील शिवाजी चौकात असलेल्या त्यांच्या घरी गेले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतोष जाधव यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांसह रात्री उशीरा हुले यांच्या घरी धाव घेतली. दरम्यान, आपल्याला धोका असल्याचे जाणवल्याने कंत्राटदार विश्वनाथ हुुले यांनी त्यांच्या पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले. या गोळीबारानंतर सर्वांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी हुले यांच्या घरी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी उपाधीक्षक विजय लगारे यांनीदेखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

याप्रकरणी २९ एप्रिल रोजी गोपनीय विभागाचे पोलीस नाईक कातखडे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात विश्वनाथ हुले, संतोष जाधव, शरद बामदले, सुधाकर गर्जे, गणेश खाडे, अमृत भोसले, मयूर जाधव, संदीप जाधव व अन्य २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक आंधळे, पोलीस हवाललदार तांदळे, पो. हे. भोसले, सानप यांनी केली.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

या घटनेनंतर कोणीच गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुमोटोअंतर्गत दोन्ही गटांतील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दोन्ही गटांतील आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी दिली.

...

हे आहे वादाचे कारण

पाटोदा नगरपंचायत होण्यापूर्वी ग्रामपंचायत होती. त्यावेळी ३ कोटी ७० लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली होती. तेव्हा संतोष जाधव हे सरपंच होते. तत्कालीन नियमानुसार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली योजनेचे काम करण्यात आले होते. योजनेचे कंत्राट हे विश्वनाथ हुले यांना मिळाले होते. संतोष जाधव हे सरपंच असल्यामुळे या योजनेचे अध्यक्ष होते. या कामाच्या आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये मतभेद झाले. पाटोदा येथे केलेल्या या योजनेच्या कामाची तक्रार करण्यात आली. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात सुरू आहे.