शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

शिवसेनेने झिरोतून हिरो केलेल्या गद्दारांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये - चंद्रकांत खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:21 IST

शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देमहायुतीच्या बीड येथील कॉर्नर बैठकीत प्रतिपादन : विकासाचे दिले आश्वासन

बीड : शिवसेनेने झिरोतून हिरो केलेले बीडमधील काही गद्दार शिवसेना सोडून गेले. आता हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता जयदत्तआण्णांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.पिंपरगव्हाण रोड आणि भक्ती कन्स्ट्रक्शन परिसरात एका कॉर्नर बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे भाजप-शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयत क्र ांती महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, दिलीप गोरे, नितीन धांडे, सुनील सुरवसे, सुनील अनभुले, अजय सवाई, संपदा गडकरी, संगीता चव्हाण, गोरख शिंगण, सागर बहीर, चंद्रकला बांगर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिलीप गोरे यांनी केले.चंद्रकांत खैरे म्हणाले की, जयदत्त क्षीरसागरांसारखा विकासाभिमुख नेता आहे. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यांचे नेटवर्क मोठे आहे. त्यांना सर्व समाज मानतो. सर्वच क्षेत्रातील मतदार त्यांच्या पाठीशी उभा आहे. आज असा नेता आज शिवसेनेत आला आहे. मध्यंतरी बीडमध्ये ज्यांची कधीच निष्ठा शिवसेनेवर नव्हती असे शिवसैनिक झाले होते. तेच गद्दार आज राष्ट्रवादीत गेले आहेत. ज्यांच्यासाठी शिवसैनिकांनी काठ्या लाठ्या खाल्ल्या, गावागावात दुश्मनी अंगावर ओढून घेतली, त्या गद्दारांनी पक्ष सोडला. आज हेच गद्दार शिवसैनिकांना निष्ठा शिकवू लागले आहेत. शिवसेनेने त्यांना आमदार केले, मंत्री केले हे आज शिवसेनेचे उपकार विसरून दुसऱ्यांचे गुणगान करत आहेत. मराठवाड्याच्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी जयदत्तअण्णासारखा लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळात असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी काम करणारा जयदत्त क्षीरसागरसारखा नेता निवडून द्या, असे ते म्हणाले.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की बीड शहर, जिल्ह्यासाठी जयदत्त क्षीरसागरांचे खूप योगदान आहे. त्यामुळे जयदत्त आण्णांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.वाढत्या भागापर्यंत सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबध्द : जयदत्त क्षीरसागरजयदत्त क्षीरसागर म्हणाले की, विकासाची जी कामे प्रलंबित आहेत, ती आगामी काळात नक्कीच पूर्ण होतील. अमृत अटल पाणीपुरवठा आणि भूमीगत गटार योजनेची कामे शहरात चालू आहेत.ही कामे करताना जनतेला थोडा त्रास होत आहे. परंतु येत्या सहा महिन्यानंतर बीड शहरातील रस्ते चकाचक झाले असतील, याबद्दल शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही.ही कामे पूर्ण झाल्यानंतर बीड शहर स्वच्छ होईल, नियमित पाणीपुरवठा होईल. वाढत्या भागापर्यंत सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विकासाला निधीची गरज असते, नुसत्या गप्पा मारून विकास होत नाही.महायुतीचा विजय निश्चित आहे. त्यात बीडची जागा सर्वाधिक मतांनी विजयी झाली पाहिजे. मतदारांनी भूलथापांना बळी न पडता धनुष्यबाणावर मतदान करून विजयी करावे असे ते म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना