शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाने झोडपल्याने शिमला मिरची फेकली बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:37 IST

नितीन कांबळे/ लोकमत न्यूज नेटवर्क कडा : पावसाने झोडपल्याने तब्बल २५ टन शिमला मिरची बांधावर फेकून देण्याची वेळ आष्टी ...

नितीन कांबळे/

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : पावसाने झोडपल्याने तब्बल २५ टन शिमला मिरची बांधावर फेकून देण्याची वेळ आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील एका शेतकऱ्यावर आली आहे. या शेतकऱ्याचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील अरुण दादासाहेब पडोळे या शेतकऱ्याने शिमला मिरचीचे १६ हजार रुपयांची रोपे एक एकर शेतीमध्ये लावले. सुरुवातीला पाऊस वेळेवर झाल्याने ही रोपे बहरून आली. मागील १५ दिवसांपूर्वी याच भागात पावसाने थैमान घातले. ढगाळ वातावरणामुळे या रोपांना कीटकनाशके, फवारणी, खुरपणी, बांधणी यासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपयांचा खर्च झाला. सुरुवातीला पाऊस जेमतेम असल्याने एक ते दीड टन शिमला मिरची वाशी या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात आली. भाव नसल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. मध्यंतरी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिरची लागवड केलेल्या शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले. साधारणपणे एक एकरमध्ये २० ते २५ टन सिमला मिरचीचे उत्पादन होते. यामधून साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पावसामुळे शेतकऱ्याचे हे स्वप्न धुळीस मिळाले. झालेला खर्चदेखील न निघता लगडलेली सर्व शिमला मिरची लाल होऊन खराब झाल्यामुळे तोडून बांधावर फेकून देण्यापलीकडे शेतकऱ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

....

पावसामुळे सिमला मिरचीचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शेती कशी करावी, असा सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडला आहे. यावर झालेला खर्च कसा आणि कुठून काढावा? निसर्गही हातातोंडातले काढून घेतोय. नेमकं कळत नाही. नशीब खराब की नियती साथ देत नाही हेच कळत नाही. असे हताश झालेले शेतकरी अरुण पडोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

...