शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

शेरी ग्रामपंचायत सलग तिसऱ्यांदा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:40 IST

कडा : आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक ग्रामपंचायत सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. बीड -जामखेड राष्ट्रीय महामार्गावर शेरी, खाकाळ वाडी ...

कडा : आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक ग्रामपंचायत सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली आहे. बीड -जामखेड राष्ट्रीय महामार्गावर शेरी, खाकाळ वाडी ग्रामपंचायत आहे. साधारण तीन हजार चारशे लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत. गावांसह वस्ती वरील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान करून कायम गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या तरूणांच्या कामावर विश्वास ठेऊन सलग तीन वेळा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा मान गावकऱ्यांनी मिळविला आहे. गाव व वस्ती अंतर्गत रस्ते, लाईट, पिण्यासाठी शुध्दीकरण केलेले पाणी, मंदिर शाळा सुशोभीकरण, तरूणाला वाचनाची आवड लागावी म्हणून वाचनालय सोबतच व्यायामशाळा, अंडर ग्राऊंड गटारी, ठिकठिकाणी शोषखड्डे, याच बरोबर पाणी टंचाई मात करण्यासाठी आणि संपूर्ण गाव टँकरमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणीदार शिवार केल्याने पाण्याची टंचाई कायम दूर झाली.

आता शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय नविन इमारती उभारणार असुन महादेव मंदिर घाट, परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, समाज मंदिर बांधकाम करण्याचा मानस असून गावच्या विकासासाठी कायम झटणार असल्याचे ग्रामपंचायतीचे शिलेदार संदिप खाकाळ, दिपक सोनवणे यांनी सागितले.

पुष्पा खाकाळ, पंचफुला सोनवणे, विजय खाकाळ, मालती शिरोळे, भारती भालेकर, स्वाती गोरे, विठ्ठल गोरे, साहेबराव माळी, लताबाई वाघुले, या नवीन सदस्यांचा मराठमोळ्या पदध्तीने सत्कार करण्यात आला.