शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

कोरोनाचे गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:25 IST

अंबाजोगाई- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने रुग्णालयात जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत ...

अंबाजोगाई- कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने रुग्णालयात जागा शिल्लक राहिली नाही. परिणामी गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.यात अनेक गंभीर रुग्णांचाही समावेश आहे तर उपचारात निष्काळजीपणा होत असल्याने घरात राहणाऱ्या रुग्णांमुळे बाधितांची संख्याही वाढू लागली आहे.

अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. तालुक्यात दररोज तीनअंकी रुग्ण निघत आहेत. १ ते २५ एप्रिलपर्यंत या कालावधीत अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे ८४६४ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी येथील कोविड सेंटर अशा दोन ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयात बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरात राहूनच उपचार घेत आहेत. घरात राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहून १७ दिवस उपचार घ्यावे लागतात. अशा रुणांना सार्वजनिक ठिकाणी अथवा इतरत्र जाता येत नाही. तरीही असे रुग्ण इतरत्र फिरत असतात. जोपर्यंत निगराणी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वॉच आहे, तोपर्यंतच हे लोक घरात राहतात. अन्यथा पुन्हा स्थिती जैसे थे राहते.

आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने अनेक ठिकाणी गंभीर रुग्णही घरात राहूनच उपचार घेत आहेत. घरात असणारे रुग्ण नियमित औषध व उपचार घेत असताना खबरदारी बाळगत नसल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढत आहे. शासनाच्या वतीने खाटा वाढविण्याबाबत उपाययोजना सुरू असल्यातरी ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. एकंदरीत वाढत्या रुग्णसंख्येचा मोठा फटका सामान्य रुग्णांना बसू लागला आहे.

गृहविलगीकरणाची कारणे काय?

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बहुतांश कोविड केंद्र बंद करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले. त्या तुलनेत खाटा कमी पडू लागल्या. परिणामी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरातच राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जाऊ लागला.

असे आहेत नियम...

रुग्ण बाधित झाल्यापासून दहा दिवस गृहविलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. उपचारानंतर रुग्णांनी पुढील ७ दिवस घरातच राहणे गरजेचे आहे. असे एकूण १७ दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

-------

अंबाजोगाई तालुक्यातील एकूण रुग्ण-८४६८

बरे झालेले रुग्ण-६२८५

उपचार सुरू असलेले -२१७४

गृहविलगीकरणातील रुग्ण-१४७६

-----------