शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

देवळालीत डाळिंब पिकावर परिसंवाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत देवळाली (पानाची) यांच्या ...

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत देवळाली (पानाची) यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब पीक परिसंवादात, महाराष्ट्र शासनाचा ‘डाळिंब रत्न’ पुरस्कारप्राप्त बाबासाहेब गोरे व आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलक संस्थेचे कांतीलाल चाणोदिया व विश्वस्त उपाध्यक्ष बाबूलाल भंडारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.एन.एस.राठी, उपप्राचार्य डॉ.जे. एम. भंडारी, पंचायत समिती सदस्य परमेश्वर शेळके, सरपंच बबनराव तळेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. विशाल वैद्य यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प, सुधारित बियाणे तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियोजनाविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी यांनी वसुंधरा संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मास्क व गुलाब पुष्प देऊन शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. चंद्रशेखर तळेकर, प्रा. डॉ. रमेश आबदार, अशोक खाडे, प्रा.गवळी एन.टी, प्रा.डॉ. जाधवर पी. बी., प्रा. हासे एस.आर व प्रा.डॉ. शिंदे एस.एम. यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम जाधव यांनी केले. सुनील खाडे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पर्यावरणपूरक उपक्रम महाविद्यालयाने अंगीकृत करण्यासाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, कार्याध्यक्ष योगेशकुमार भंडारी, सचिव हेमंतकुमार पोखरणा, उपाध्यक्ष रमेशलाल गुगळे व अनिलकुमार झाडमुथ्था, मंत्री बिपीनकुमार भंडारी, विनोद बलदोटा, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी, तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्वस्त व कार्यकारी मंडळांनी प्रोत्साहन दिले.

मृदा, जल परीक्षण काळाची गरज

यावेळी बाबासाहेब गोरे यांनी शास्त्रीय पद्धतीने डाळिंब पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून सेंद्रिय औषधांचे उपयोग सांगितले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. मृदा व जल परीक्षण काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. बाबूलाल भंडारी यांनी श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ येत्या तीन वर्षात शतक महोत्सवात पदार्पण करणारी जिल्ह्यातील एकमेव जैन अल्पसंख्यांक संस्था असल्याचे सांगितले.