शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

देवळालीत डाळिंब पिकावर परिसंवाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत देवळाली (पानाची) यांच्या ...

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत देवळाली (पानाची) यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब पीक परिसंवादात, महाराष्ट्र शासनाचा ‘डाळिंब रत्न’ पुरस्कारप्राप्त बाबासाहेब गोरे व आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलक संस्थेचे कांतीलाल चाणोदिया व विश्वस्त उपाध्यक्ष बाबूलाल भंडारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.एन.एस.राठी, उपप्राचार्य डॉ.जे. एम. भंडारी, पंचायत समिती सदस्य परमेश्वर शेळके, सरपंच बबनराव तळेकर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. डॉ. विशाल वैद्य यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प, सुधारित बियाणे तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियोजनाविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी यांनी वसुंधरा संवर्धन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी मास्क व गुलाब पुष्प देऊन शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. चंद्रशेखर तळेकर, प्रा. डॉ. रमेश आबदार, अशोक खाडे, प्रा.गवळी एन.टी, प्रा.डॉ. जाधवर पी. बी., प्रा. हासे एस.आर व प्रा.डॉ. शिंदे एस.एम. यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदाम जाधव यांनी केले. सुनील खाडे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पर्यावरणपूरक उपक्रम महाविद्यालयाने अंगीकृत करण्यासाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, कार्याध्यक्ष योगेशकुमार भंडारी, सचिव हेमंतकुमार पोखरणा, उपाध्यक्ष रमेशलाल गुगळे व अनिलकुमार झाडमुथ्था, मंत्री बिपीनकुमार भंडारी, विनोद बलदोटा, कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी, तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्वस्त व कार्यकारी मंडळांनी प्रोत्साहन दिले.

मृदा, जल परीक्षण काळाची गरज

यावेळी बाबासाहेब गोरे यांनी शास्त्रीय पद्धतीने डाळिंब पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन करून सेंद्रिय औषधांचे उपयोग सांगितले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली. मृदा व जल परीक्षण काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. बाबूलाल भंडारी यांनी श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ येत्या तीन वर्षात शतक महोत्सवात पदार्पण करणारी जिल्ह्यातील एकमेव जैन अल्पसंख्यांक संस्था असल्याचे सांगितले.