शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

२६ लाख नागरिकांच्या सुरक्षेचा भार २१९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील २ हजार १९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २६ लाख १० हजार ...

बीड : जिल्ह्यातील एकूण २८ पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील २ हजार १९७ पोलीस कर्मचाऱ्यांवर जवळपास २६ लाख १० हजार नागरिकांच्या सुरक्षेचा भार आहे. शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणही या कमी संख्येमुळे पडत आहे. कमी कुमक असतानादेखील संवेदनशील जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे.

बीड जिल्ह्यातील सरासरी लोकसंख्या २६ लाख १० हजार इतकी आहे. त्या तुलनेत पोलीस दलातील कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्येचे प्रमाण मात्र अत्याल्प आहे. जवळपास १० वर्षापूर्वी च्या जनगणनेनुसार २३१० कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, त्या वर्षापासून आतापर्यंत २,१९७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे भरलेली आहे. त्यापैकी देखील काही जण आरोग्य रजेवर, प्रसूती रजेवर किंवा निलंबित असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा तण अधिकच वाढला आहे. राज्यात तब्बल १२ हजार ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीनंतर बीड जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची अपेक्षा पोलीस प्रशासनाला आहे.

असे आहे पोलीस दलातील संख्याबळ

जिल्ह्यात पोलीस अधीक्षक एक, अपर पोलीस अधीक्षक २, उपाधीक्षक मंजूक ८ कर्यरत ६, पोनि मंजूर २५ कार्यरत २४, सपोनि मंजूर ६१ कार्यरत ५९, पोउपनि मंजूर ९४ कार्यरत ७५, पोलीस कर्मचारी मंजूर २३१० कार्यरत २१९७ असे जिल्ह्यीतल पोलीस दलातील संख्याबळ आहे.

२६,१०,००० जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या

२ हजार १९७ पोलीस कर्मचारी

गुन्हेगारीमध्ये मागील वर्षी वाढ

घरफोडी, दुखापत करणे, दरोडा, अत्याचार या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. गतवर्षी अत्याचाराचे १२९ गुन्हे घडले आहेत. तर, घरफोडीचे २१७ गुन्हे नोंद झाले आहेत. तर, दुखापतीचे १,१०८ गुन्हे दाखल झाले आहेत. दरोडे १४ ठिकाणी झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. कर्मचाऱ्यांची संख्या व अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे देखील गुन्हेगारीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, तरीदेखील कायदा आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सक्षमपणे कर्तव्य बजावत आहे.

संवेदनशील गावांवर पोलिसांची करडी नजर

बीड जिल्ह्यातील काही गावांवर पोलिसांची करडी नजर असते, तसेच उत्सव काळात अतिरक्त फौजफाटा तैनात करावा लागते. शिवाय नाकाबंदी रात्रीची गस्तदेखील घालावी लागते, यातूनच नागरिकांच्या सुरक्षेला प्राध्यान्य दिले जाते. राज्याच्या राजकारणात बीड हा कायम केंद्रस्थानी असलेला जिल्हा आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांचे कार्यक्रमांची संख्यादेखील जास्त असते त्या ठिकाणीदेखील पोलीस सुरक्षा देणे गरजेचे असल्यामुळे अतिरिक्त ताण पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहेत.

मनुष्यबळ ही कमी आहे हे मान्य आहे, तरीदेखील आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्याची असलेली संख्या व जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण यामुळे जास्तीचा ताण पोलीस कर्मचाऱ्यांवर येत आहे. त्यासंदर्भात सविस्तर अहवालाद्वारे शासनाकडे वाढीव मनुष्यबळाची मागणी करण्यात येईल.

आर. राजा पोलीस अधीक्षक, बीड