शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

३४ गावांमध्ये अंत्यविधीसाठी जागेची शोधाशोध! स्मशानभूमीचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:56 IST

अनेक गावांत स्मशानभूमीसाठी सार्वजनिक जागाच शिल्लक नाही

अनिल महाजन धारुर (जि.बीड) : जीवनाचा अंतिम प्रवास सुरळीत झाला पाहिजे. मृत्यू झाल्यानंतर वैर संपते, अशी सर्वत्र भावना असते. मात्र धारुर तालुक्यातील ५४ गावांपैकी तब्बल ३४ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मनशानभूमीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झाल्यानंतर अनेक कुटूंबांना अंत्यसंस्कार कोठे करावेत हा प्रश्न निर्माण होतो. यातुन अनेकवेळा वादही उद्भवतात. शेवटी एखाद्या नदीकाठची जागा शोधावी लागते, अशी व्यथा नागरिकांनी व्यक्त केली.

धारुर तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. या तालुक्यात एकुण ५४ ग्रामपंचायती आहेत. वाड्या, वस्त्या, तांडे आहेत. त्यापैकी केवळ २० ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचीही दुरावस्था झालेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाहीत. ही परिस्थिती स्मशानभूमी असलेल्या गावातील आहे. तर ३४ ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमी उभारण्यासाठीच जागा उपलब्ध नाही. या गावांमध्ये ज्यांच्याकडे स्वत:चे शेत आहे. ते शेतात अंत्यसंस्कार करतात. मात्र भूमिहीन असलेल्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शोधावी लागते. ज्यांच्याकडे जमिन आहे. त्यांना विनंती करावी लागते. वादळ, पाऊस, वारा आल्यास तात्पुरता निवारा उभत्तरावा लागतो. यात नातेवाईकांची दु:खाच्या वेळी त्रेधातिरपिट उडते. याविषयी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे यांच्याशी संपर्कस साधला असता, नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे गावनिहाय स्मशानभूमीची माहिती घेऊन यावर भाष्य करता येईल, असे सांगितले.4000 लोकसंख्येच्या गावातही स्मशानभूमी नाहीचार हजार लोकसंख्येचे गाव असलेले अंजनडोहमध्ये स्मशानभूमी अस्तित्वात नाही. मृत्यू झाल्यानंतर अनेकवेळा जागेची शोधाशोध करावी लागते. ज्यांना स्वत:चे शेत नाही, त्यांना प्रचंड अडचणींचा सामना गावात करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र स्मशानभूमी उभाराव्यात, अशी मागणी गावातील युवक कार्यकर्ते योगेश साखरे यांनी केली.