शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले ...

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले तरी उपस्थितीचे प्रमाण वाढलेले नाही; तर दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची धाकधूक सुरू आहे. काही पालकांनी स्पष्टपणे नकार दर्शविला; तर काही पालकांनी १० महिन्यांपासून घरात एकलकोंडे बनलेल्या मुलांना आकाश मोकळे व्हावे म्हणून शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बहुतांश पालक अजूनही संभ्रमात आहेत. मुलांचे लसीकरण करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यायला हवा होता, असा सूरही पालकांमधून उमटला. मागील वर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला; परंतु कुठे मोबाईलच नसणे, तर कुठे तांत्रिक अडथळे आले. आता शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याआधी शासनाने काेविड-१९ बाबत दक्षतेसाठी शाळांमध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणीचे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये काटेकोर, तर अनेक शाळांमध्ये पालनच होत नसल्याची स्थिती आहे. हे पाहून पालकांमध्ये धाकधूक आहे. मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आता मात्र मुलांना शाळेत पाठविले पाहिजे, असे काही पालकांचे मत आहे.

नववी ते बारावी उपस्थितीचा आलेख वाढेना

नववी ते १२वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवस उपस्थिती कमी होती. मात्र त्यानंतर हे प्रमाण वाढले. एकूण उपस्थितीनुसार हे प्रमाण शहरी भागात ५५, तर ग्रामीण भागात ४५ टक्के राहिले. परंतु त्यापलीकडे उपस्थितीमध्ये वाढ होऊ शकली नाही. उलट काही ठिकाणी शिक्षक बाधित निघाले. ते बरे झाले असले तरी उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. पालकांमधून कोरोनाचे भय अद्याप दूर झाले नसल्याचे चर्चेतून जाणवले.

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पाचवी : ५३०२५

सहावी : ५१७४३

सातवी : ५१ २२८

आठवी : ४९५४०

जिल्ह्यातील शाळांची संख्या : १९९४

शिक्षकांची संख्या : ९०४३

पालकांना काय वाटते?

कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या शाळा सुरू करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड- १९ च्या नियमांचे काटेकोर पालन होणार आहे का? कोण जबाबदारी घेणार? शाळेपेक्षा लेकरांचा जीव महत्त्वाचा आहे. मुलांना पाठवणार नाही.

- रोहिदास घोडके, पालक, बीड.

----

आठ-नऊ महिने ऑनलाईन शिक्षण झाले. आता ऑफलाईन झाले तर बरे होईल. कोरोनाचे वातावरण कमी झाले आहे. शाळा सुरू होणे आवश्यक आहे. शाळांनी काळजी घेत निर्जंतुकीकरण व नियमांचे पालन झाल्यास अडचणी येणार नाहीत. मुलांना शाळेत पाठवणार.

- शिवाजी परळकर, पालक

------------

मुलांना आकाश मोकळे हवे

घरी मुले मोबाईल, टीव्हीच्या आहारी गेली आहेत. एकलकोंडी बनत आहेत. त्यामुळे पालकही हैराण झाले आहेत. शाळेत मुले गेली तर अभ्यासाला लागतील. सामूहिक खेळ नसले तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मोकळे होतील. मुलाला शाळेत पाठवणार आहे.

- मुरलीधर राऊत, पालक

----

पालकांनी टाळू नये

पालकांनी संमतीपत्र देऊन मुलांना शाळेत पाठवावे. मुले आजारी असतील तर पाठवू नये. मास्क, सॅनिटायझर सोबत द्यावे. डबा, पाण्याच्या बाटलीची अदलाबदल करू नये, शाळेत घोळका करू नये, अशा दक्षतेच्या सूचना कराव्यात. परिस्थिती नियमित व पूर्वपदावर येत आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्याचे पालकांनी टाळू नये. शाळांनीही शासन निर्देशांचे पालन करून काळजी घ्यावी.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)

..........................