शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

शाळा भरल्या, मात्र पोहोचायला बसच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी अनेक गावांमध्ये अद्याप राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत शाळा गाठावी लागणार आहे. यात त्यांचे हाल होणार असून, बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.

जिल्ह्यात १ हजार ६३९ शाळा आहेत. यात पाचवी ते आठवीपर्यंत १ लाख ८५ हजार ८३५ एवढे विद्यार्थी असून, नववी ते बारावीपर्यंत ७८ हजार ६३० विद्यार्थी आहेत. आधी नववीपासून आणि आता पाचवीपासून शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात काही गावांत अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आजही बस नसल्याचे दिसत आहे. लाॅकडाऊनंतर हळूहळू बसचे चाक पूर्णपणे धावू लागले असले तरी जिल्ह्यात १०० टक्के बसेस अद्याप पूर्ण क्षमतेने धावत नाहीत. याचा फटका सामान्यांना बसत आहे. आता तोच फटका विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. विभागीय नियंत्रक बी. एस. जगनोर हे संवेदनशील असून विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, यावर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

मानव विकासच्या बसेस आजपासून धावणार

जिल्ह्यात मानव विकासच्या सात बसेस आहेत. ग्रामीण भागासह वाड्या, वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. सध्या तरी बीड जिल्ह्यातील सातही बस या धारूर आगारांतर्गत धावत आहेत. धारूरसह वडवणी व शेजारच्या गावांतील विद्यार्थी शाळेवर पोहोचविण्याचे काम त्या करतात. दररोज ९७० किमी अंतर त्या पार करतात. परंतु इतर गावांमध्येही बसेस सुरू करण्याबाबत कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरू लागली आहे.

गावांत, वाड्यावर बस नाही

लॉकडाऊन उघडल्यानंतर बसेस काही प्रमाणात धावू लागल्या आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील अनेक गावांत, वाड्यांवर बस पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील लोक आजही जीप, रिक्षा आदी खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करत आहेत. यात आर्थिक भुर्दंडासह अपघातास निमंत्रण मिळत आहे.

बसेस सुरू कराव्यात, अन्यथा आंदोल करू

लॉकडाऊन उघडल्यानंतरही आजही अनेक गावांत रापमची बस पोहोचलेली नाही. ही गंभीर बाब आहे. यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. यावर रापमने वेळीच कारवाई कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू.

- राहुल वाईककर, संभाजी ब्रिगेड, बीड

विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, यासाठी रापमने उपाययोजना करण्याची गरज आहे. शिक्षणमंत्री व परिवहन मंत्र्यांना माझी विनंती असेल, की त्यांनी या बसेस लवकर सुरू करण्यासाठी कारवाई करावी.

-सुजाता मोराळे, सामाजिक कार्यकर्त्या

आगारप्रमुखांचा कोट

जिल्ह्यात मानव विकासच्या सात बसेस असून, सोमवारपासून त्या धावतील. इतर गावांतही मागणीप्रमाणे बसेस सुरू केल्या जात आहेत. पूर्णच गावात बस सोडण्यासाठी प्रयत्न करू.

- एस. बी. पडवळ

विभागीय वाहतूक अधिकारी, बीड