शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

स्कूल बस चालकही आले अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:23 IST

अंबाजोगाई : विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या हाताला यावर्षीही कामच मिळाले नसल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत ...

अंबाजोगाई : विद्यार्थ्यांविना शाळा सुरू आहेत. त्यामुळे स्कूल बस चालकांच्या हाताला यावर्षीही कामच मिळाले नसल्याने ते सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे मिळेल ते काम करून पोट भरत आहेत. शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कॉ. अजय बुरांडे यांनी केली आहे.

-------------------------

पांदण रस्त्यांवर अतिक्रमण

अंबाजोगाई : तालुक्यातील काही पांदण रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित असल्याने पावसाळ्यात शेकडो शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी या रस्त्यांवरच अतिक्रमण केले आहे. शेतीची मशागत व बांधबंदिस्ती करताना झाडे-झुडपे वाढली. अतिक्रमण केल्याने पांदण रस्ते गायब झाले. त्यामुळे पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

---------------------------

व्यायाम साहित्याची दुरुस्ती करावी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील काही परिसरामध्ये लावण्यात आलेल्या व्यायाम शाळेतील साहित्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या साहित्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

-----------------------------

मजूर संस्था आल्या संकटात

अंबाजोगाई : बेरोजगार मजूर संस्थांना शासकीय पातळीवर कामच मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात तरी या संस्थांना काम देऊन दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, काम मिळेल या आशेने मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी या संस्थांकडे नोंदणी केली आहे.

------------------------------

मेस चालकांचे आर्थिक नुकसान

अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिक्षण तसेच काही व्यवसाय अजूनही ठप्पच आहेत. त्यामुळे मेस चालकांचे मोठे नुकसान होत असून त्यांना ग्राहकच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यांना आता शाळा, महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

--------------------------------

विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमधील काही वस्त्यांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झालेला नाही. या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांना विशेष घटक योजनेअंतर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे वीज नसल्याने त्यांना दुसऱ्याच्या घरून वीज घ्यावी लागत आहे. हा प्रकार धोकादायक असल्याने वीज मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी रिपाइं महिला आघाडीच्या बीड जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.