शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

बोंडअळी अनुदान वाटपामध्ये घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ...

ठळक मुद्देअनेक गावे वंचित : शासनाकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप; ग्रामस्थांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ठिकाणी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत संबंधित तलाठी व अधिकाºयांविरोधात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. शेतकºयांना झालेल्या नुकसान भरपाईपोट पहिल्या टप्प्यात ६८ कोटी तर दुसºया टप्प्यात १०२ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. या माध्यमातून जवळपास १ लाख ६२ हजार शेतकºयांपर्यंत अनुदान रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ज्या व्यक्तींच्या नावे शेतीच नाही, किंवा ज्यांचे क्षेत्र कमी असून त्यांचे क्षेत्र कागदोपत्री जास्त दाखवून अनुदान लाटल्याचा गैरप्रकार समोर आला आहे.अनुदान अद्यापही मिळाले नाहीखरीप हंगाम संपत आला, तरी देखील मागील वर्षीच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारे बोंडअळी अनुदान अजून मिळाले नाही. पाऊस नसल्यामुळे या हंगामातील पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीमध्ये बोंडअळी अनुदान हा शेतकºयांसाठी आधार ठरणार होता. मात्र, रबी हंगाम आला तरी देखील मागील वर्षातील अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शासनाकडून दिशाभूल होत असल्याचे नेकनूर परिसरातील अंधापुरी येथील शेतकरी काना टेकडे यांनी सांगीतले.असा झाला घोटाळाबीड तालुक्यातील रामगांव, नाथापूर, लोणी, शहजानपूर सह इतर गांवातील अनेक शेतकºयांची नावे एकापेक्षा जास्त अनुदान यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एक खाते क्रमांक अनेकांना देण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा सहकारी बँके च्या माध्यमातून अनुदान उचलण्यात आलेले आहे.८/अ च्या उताºयानुसार क्षेत्र कमी असताना देखील काही गुंठ्यांमध्ये ते वाढवण्यात आले आहे.हा प्रकार लपवण्यासाठी ज्या शेतकºयांचे क्षेत्र जास्त आहे, त्यांचे कापूस लागवडीखालील क्षेत्रांमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळ असणाºयाला जास्त फायदा आणि जास्त क्षेत्र असणारे अनुदानापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.त्याचसोबत जे भूमिहीन असणाºयांच्या नावे देखील शेती असल्याचे दाखवण्यात आलेली आहे. याची संपूर्ण माहिती प्रशासनास देण्यात आल्याचे संबंधित गावांमधील शेतकºयांनी सांगितले.तसेच असा प्रकार सगळ््या जिल्हायात झाल्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे दोन टप्प्यात वाटप केलेल्या बोंडअळी अनुदानाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस