शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बोंडअळी अनुदान वाटपामध्ये घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ...

ठळक मुद्देअनेक गावे वंचित : शासनाकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप; ग्रामस्थांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यापैकी दोन हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. अद्यापही अनेक गावे अनुदानापूसन वंचित आहेत. तसेच अनेक ठिकाणी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप करत संबंधित तलाठी व अधिकाºयांविरोधात ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली होती. शेतकºयांना झालेल्या नुकसान भरपाईपोट पहिल्या टप्प्यात ६८ कोटी तर दुसºया टप्प्यात १०२ कोटी रुपये अनुदान देण्यात आले होते. या माध्यमातून जवळपास १ लाख ६२ हजार शेतकºयांपर्यंत अनुदान रक्कम वाटप करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ज्या व्यक्तींच्या नावे शेतीच नाही, किंवा ज्यांचे क्षेत्र कमी असून त्यांचे क्षेत्र कागदोपत्री जास्त दाखवून अनुदान लाटल्याचा गैरप्रकार समोर आला आहे.अनुदान अद्यापही मिळाले नाहीखरीप हंगाम संपत आला, तरी देखील मागील वर्षीच्या नुकसान भरपाईपोटी मिळणारे बोंडअळी अनुदान अजून मिळाले नाही. पाऊस नसल्यामुळे या हंगामातील पिके हातची गेली आहेत. या परिस्थितीमध्ये बोंडअळी अनुदान हा शेतकºयांसाठी आधार ठरणार होता. मात्र, रबी हंगाम आला तरी देखील मागील वर्षातील अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शासनाकडून दिशाभूल होत असल्याचे नेकनूर परिसरातील अंधापुरी येथील शेतकरी काना टेकडे यांनी सांगीतले.असा झाला घोटाळाबीड तालुक्यातील रामगांव, नाथापूर, लोणी, शहजानपूर सह इतर गांवातील अनेक शेतकºयांची नावे एकापेक्षा जास्त अनुदान यादीमध्ये टाकण्यात आली आहेत. एक खाते क्रमांक अनेकांना देण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा सहकारी बँके च्या माध्यमातून अनुदान उचलण्यात आलेले आहे.८/अ च्या उताºयानुसार क्षेत्र कमी असताना देखील काही गुंठ्यांमध्ये ते वाढवण्यात आले आहे.हा प्रकार लपवण्यासाठी ज्या शेतकºयांचे क्षेत्र जास्त आहे, त्यांचे कापूस लागवडीखालील क्षेत्रांमध्ये घट करण्यात आली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रफळ असणाºयाला जास्त फायदा आणि जास्त क्षेत्र असणारे अनुदानापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.त्याचसोबत जे भूमिहीन असणाºयांच्या नावे देखील शेती असल्याचे दाखवण्यात आलेली आहे. याची संपूर्ण माहिती प्रशासनास देण्यात आल्याचे संबंधित गावांमधील शेतकºयांनी सांगितले.तसेच असा प्रकार सगळ््या जिल्हायात झाल्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे दोन टप्प्यात वाटप केलेल्या बोंडअळी अनुदानाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूस