शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सर्जा-राजा हरवला अन् ट्रॅक्टर आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

नितीन कांबळे कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावा-गावातील शेतकऱ्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; ...

नितीन कांबळे

कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावा-गावातील शेतकऱ्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; पण काही वर्षांपासून बैल सांभाळण्यापेक्षा दुभत्या गाईंच्या पालनाकडे कल वाढला आहे.

शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने शेतकऱ्यांच्या दावणीपुढील बैलांची संख्या घटली. बैलांऐवजी घरासमोर आता ट्रॅक्टर दिसू लागले. काळाच्या ओघात सर्जा-राजा हरवला अन् ट्रॅक्टर आला, असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात लाखांच्या घरात असलेल्या बैलांची संख्या आता फक्त १७ हजारांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्जा-राजाची बैलजोड आता दावणीतून नामशेष होऊ लागल्याचे पशुधन विकास कार्यालयाचे आकडे सांगतात.

पूर्वी पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांचे पूजन करून थाटामाटात मिरवणूक काढायचा. तेव्हा गावाच्या मंदिरासमोर जागा अपुरी पडायची. बैलांशिवाय शेती नसायची; पण आता आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने आणि बैलजोड्या संभाळताना पोषणाचा खर्च विनाकारण वाटू लागल्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागली आहे. दुसरीकडे बैलजोडीऐवजी दुभत्या गाई घेऊन त्या सांभाळण्याकडे कल वाढला. त्या पैशातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागल्याने बैलजोडी भविष्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पोळ्याला बोटावर मोजता येतील एवढ्याच बैलजोड्या आहेत.

कृषी विभागाकडून ट्रॅक्टर

आधुनिक काळात शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला महत्त्व येऊ लागले. मोठ्या प्रमाणावर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू लागले. त्याचबरोबर कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर मिळू लागल्याने बैलजोडीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

आकडे सांगतात... बैलांची संख्या घटली

तालुका पशुधन विकास कार्यालयात २०१९ च्या पशुगणनेनुसार शेतीकामासाठी फक्त १७ हजार ५८९ बैलांची नोंद आहे. गावरान, विदेशी, रेडकू अशा लहान-मोठ्यांची एकूण २५ हजार ५५९ एवढी नोंद असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

खर्च वाढल्याने सांभाळायचा प्रश्न

बैलांना मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. कमी क्षेत्रफळाची शेती असल्याने बैलजोडी सांभाळणे शक्य नाही. त्याऐवजी ट्रॅक्टरची शेती परवडत असल्याचे लिंबोडी येथील शेतकरी गहिनीनाथ आंधळे म्हणाले. तसेच दहा वर्षांपूर्वी आमच्या गावात घरोघरी बैलजोडी असायची. त्यानेच शेती व्हायची. पोळ्याला बैलजोडी दारात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटायचा. आता गावात दहा ते पंधराच बैल आहेत, असे लिंबोडी येथील सोपान आंधळे यांनी सांगितले.