शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST

अंबाजोगाई : गावोगावी स्वच्छता अभियान जोमाने राबविले जात होते. त्यामुळे गावची स्वच्छताही कायम राहत होती. मात्र, कोरोनाचे संकट ...

अंबाजोगाई : गावोगावी स्वच्छता अभियान जोमाने राबविले जात होते. त्यामुळे गावची स्वच्छताही कायम राहत होती. मात्र, कोरोनाचे संकट उद्भवल्यापासून स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पुन्हा लोकसहभागातून गावोगावी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी होऊ लागली.

मंदिरांमध्ये कोरोना उपाययोजनांकडे लक्ष

अंबाजोगाई : शासनाने कोरोनानंतर बंद केलेली मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंद निर्माण झालेला असला तरी अद्यापही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन अंबाजोगाई शहर व परिसरात अनेक मंदिरांच्या विश्वस्तांकडून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू दिली जात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

वाहनांमुळे अडथळा

अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बसस्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व अ‍ॅटो रिक्षा पार्किंग केली जातात. अगोदरच हा रस्ता अरूंद असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते. त्यातच प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. कोंडीमुळे अपघात घडू लागले आहेत. या वाहनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

निर्जंतुकीकरण होईना

अंबाजोगाई : एस. टी. महामंडळाच्या बसेस निर्जंतुकीकरण करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. बसेससोबत चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहाचेही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक आगारांना दिल्या आहेत. उपाययोजनांचे पालन आगारप्रमुखांकडून केले जात नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच

अंबाजोगाई : प्लास्टिक वापरासाठी बंदी असतानाही अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जातात. भाजी मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नगरपरिषद प्रशासन कधीतरी प्लास्टिक वापराबाबत कारवाई करते. कारवाई नियमित करण्याची मागणी आहे.

रस्ते बांधकाम रखडले, नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : बहुतांश गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी निधी न मिळाल्यामुळे कामे थांबली आहेत. पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवून निधीसाठी तरतूद करावी व कामे मार्गी लावावीत, अशी मागणी आहे.