शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

अंबाजोगाई: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत ...

अंबाजोगाई: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. अनेकदा लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही दुर्लक्ष झाले आहे. डोळ्यांसमोर संकट दिसत असूनही दुसरा मार्गच नसल्याने याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. आरोग्यासह इतर कामांसाठी नियमित तालुक्याला जावेच लागते. मात्र, रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे.

------------------------------

स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण

अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगर परिषदेने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

------------------------

विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. आता विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होईल, अशी पालकांना विचारणा करीत आहेत. शासनाने कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------------------------

भाजीपाल्याचे भाव पुन्हा कडाडले

अंबाजोगाई: किरकोळ भाजीपाल्याचे दर प्रति किलो शंभरीच्या जवळपास गेले आहेत. कांदे, टोमॅटो, बटाटे, वांगे, मिरची वाट्टेल त्या भावाने विकली जात आहे. याचा फटका गरिबांना बसत आहे. त्यामुळे किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

----------------------------

निराधारांना शासकीय योजनांचा लाभ द्या

अंबाजोगाई: श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा योजनांतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनांचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

------------------------------

त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या वाढली

अंबाजोगाई : श्वानांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण वाढले असून त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या देखील वाढली आहे. शहरात जवळपास सर्वच भटक्या श्वानांना कमी-अधिक प्रमाणात त्वचारोगाची लागण झाली आहे. त्यामुळे भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरड्यावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पोटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो, असे पशुवैद्यकीय डॉक्टरांचे म्हणणे आहे.