शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

अंबाजोगाई: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत ...

अंबाजोगाई: जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र, अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. अनेकदा लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही दुर्लक्ष झाले आहे. डोळ्यांसमोर संकट दिसत असूनही दुसरा मार्गच नसल्याने याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. आरोग्यासह इतर कामांसाठी नियमित तालुक्याला जावेच लागते. मात्र, रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे.

------------------------------

स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण

अंबाजोगाई : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगर परिषदेने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

------------------------

विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे अद्यापही शाळा सुरू झाल्या नाहीत. आता विद्यार्थी घरी राहून कंटाळले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होईल, अशी पालकांना विचारणा करीत आहेत. शासनाने कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद तापडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------------------------

भाजीपाल्याचे भाव पुन्हा कडाडले

अंबाजोगाई: किरकोळ भाजीपाल्याचे दर प्रति किलो शंभरीच्या जवळपास गेले आहेत. कांदे, टोमॅटो, बटाटे, वांगे, मिरची वाट्टेल त्या भावाने विकली जात आहे. याचा फटका गरिबांना बसत आहे. त्यामुळे किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

----------------------------

निराधारांना शासकीय योजनांचा लाभ द्या

अंबाजोगाई: श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, अशा योजनांतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनांचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

------------------------------

त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या वाढली

अंबाजोगाई : श्वानांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण वाढले असून त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या देखील वाढली आहे. शहरात जवळपास सर्वच भटक्या श्वानांना कमी-अधिक प्रमाणात त्वचारोगाची लागण झाली आहे. त्यामुळे भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रात्री एकट्या व्यक्तीने पायी जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे आहे. शहरात गल्लोगल्ली त्वचारोग झालेले भटके श्वान फिरताना दिसतात. या श्वानांनी जर चावा घेतला तर नागरिकांचा जीव धोक्यात येईल, अशी परिस्थिती आहे. घाण पाणी प्यायल्याने अथवा उकिरड्यावरील फेकलेले जेवण खाल्ल्याने या श्वानांच्या पोटात जंत होतात आणि त्यामुळे त्यांना त्वचारोग होतो, असे पशुवैद्यकीय डॉक्टरांचे म्हणणे आहे.