शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्ते ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने वाहने तर सोडा, साधे पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने वाहने तर सोडा, साधे पायी चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवरील खड्ड्यांची मोजदाद केली तर हा मार्ग कधी डांबरीकरण झाला होता का नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

खड्डेमय रस्त्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक रस्त्यांवर तर डांबर शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.

अगदी नजीकच्या ८ ते १० किलोमीटर लांबीच्या ग्रामीण मार्गाची डागडुजी, दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. साखर कारखाना ते धानोरा या गावाचे किमान अंतर नऊ किलोमीटर आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर बांधकाम विभागाने प्रतिवर्षी देखभाल- दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाची दुरवस्था अधिक प्रमाणात होत गेली आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयांतर्गत असणारे अनेक रस्ते आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अंबासाखर ते देवळा हा मुख्य मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे, तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या राडीतांडा ते मुडेगाव या रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता खराब झाला असला तरीही या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साइडपट्ट्यांचे काम अजूनही झालेले नाही. अशीच दुरवस्था राडी ते मुडेगाव या रस्त्याची झालेली आहे.

ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. वरचेवर ठिगळ लावल्यासारखी दुरुस्ती करून जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान बांधकाम विभागाचे अधिकारी करून घेत आहेत. मात्र त्यांच्या या कारभाराने अनेकांनी याच रस्त्यावर जीव गमावला आहे.

पावसाळ्यात अनेक रस्ते नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीसाठी सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

===Photopath===

090621\avinash mudegaonkar_img-20210604-wa0069_14.jpg