शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

ग्रामीण भागातील रस्ते ठरताहेत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने वाहने तर सोडा, साधे पायी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्याने वाहने तर सोडा, साधे पायी चालणेही अवघड झाले आहे. अनेक मार्गांवरील खड्ड्यांची मोजदाद केली तर हा मार्ग कधी डांबरीकरण झाला होता का नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

खड्डेमय रस्त्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक रस्त्यांवर तर डांबर शोधूनही सापडत नसल्याचे चित्र आहे.

अगदी नजीकच्या ८ ते १० किलोमीटर लांबीच्या ग्रामीण मार्गाची डागडुजी, दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केली की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. साखर कारखाना ते धानोरा या गावाचे किमान अंतर नऊ किलोमीटर आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर बांधकाम विभागाने प्रतिवर्षी देखभाल- दुरुस्ती केली नाही. प्रत्येक वर्षी या मार्गाची दुरवस्था अधिक प्रमाणात होत गेली आहे. सार्वजनिक बांधकाम कार्यालयांतर्गत असणारे अनेक रस्ते आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. अंबासाखर ते देवळा हा मुख्य मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे, तर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या राडीतांडा ते मुडेगाव या रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता खराब झाला असला तरीही या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साइडपट्ट्यांचे काम अजूनही झालेले नाही. अशीच दुरवस्था राडी ते मुडेगाव या रस्त्याची झालेली आहे.

ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. वरचेवर ठिगळ लावल्यासारखी दुरुस्ती करून जबाबदारी पूर्ण केल्याचे समाधान बांधकाम विभागाचे अधिकारी करून घेत आहेत. मात्र त्यांच्या या कारभाराने अनेकांनी याच रस्त्यावर जीव गमावला आहे.

पावसाळ्यात अनेक रस्ते नागरिकांना त्रासदायक ठरू लागले आहेत. यावर तातडीने बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्ता रहदारीसाठी सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

===Photopath===

090621\avinash mudegaonkar_img-20210604-wa0069_14.jpg