शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

धोका वाढतोय; पुन्हा पाच बळी, बाधितांचा आकडा ३० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST

बीड : जिल्ह्याची कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. शुक्रवारीही पुन्हा ७३२ नवे रुग्ण आढळून आले. पाच जणांचा मृत्यू झाला. ...

बीड : जिल्ह्याची कोरोनास्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. शुक्रवारीही पुन्हा ७३२ नवे रुग्ण आढळून आले. पाच जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक हे की, ३३८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. मागील काही दिवसांत मृत्यू आणि नव्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसत आहे, तसेच एकूण बाधितांचा आकडाही ३० हजार पार गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल ६ हजार ४९६ जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये ५ हजार ७६४ जण कोरोना निगेटिव्ह आढळून आले, तर ७३२ नवे रुग्ण आढळून आले. बीड, अंबाजोगाई आणि आष्टीत सर्वाधिक रुग्ण आढळले. बीडमध्ये २१६, अंबाजोगाईत १२७, आष्टीत १२७, धारूरमध्ये १७, गेवराईत ५५, केजमध्ये ६७, माजलगावात ३५, परळीत ४८, पाटोद्यात २६, शिरूरमध्ये ०६ आणि वडवणी तालुक्यात ०८ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३३८ जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी दिली गेली, तसेच शुक्रवारी पाच जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये माजलगाव शहरातील समर्थनगर भागातील ५८ वर्षीय पुरुष, केज शहरातील ६५ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील ७० वर्षीय महिला, केज तालुक्यातील नांदूरघाट येथील ६५ वर्षीय पुरुष, आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३० हजार ५१४ झाली आहे. पैकी २६ हजार ७२४ जण कोरोनामुक्त झाले असून, ६९० जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.