शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, ‘मिली बग’ने स्वप्नांचा चुराडा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात कापूस क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ ...

बीड : जिल्ह्यात कापूस क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र, ‘मिली बग’सारख्या कीड रोगामुळे सोयाबीनचे उत्पन्न हेक्टरी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

२०१७ ते २०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरा क्षेत्र वाढले आहे. दरवर्षी वाढत असलेला सोयाबीनचा भाव व कापूस पिकापेक्षा कमी कष्ट व खर्च लागतो, या कारणांमुळे देखील सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र हे एक लाख ९० हजार ७४८ इतके होते. त्या तुलनेत सोयाबीनचा पेरा दोन लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. मात्र, ‘मिली बग’च्या प्रादुर्भावामुळे हेक्टरी उतारा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...

काय आहे मिली बग

मिली बग ही एक कीड आहे. याला मराठीत पिठ्या ढेकूण म्हणतात. हा अंडी न घालता पिलांना जन्म देतो. अंगावर लोकरीसारखे आवरण असल्याने सहसा कुठलेही कीटकनाशक या किडीच्या शरीरात प्रवेश करत नाही. जास्वंद, सीताफळ व पपई या पिकांवर प्रामुख्याने आढळतो. मिली बग ही कीड झाडातील रस शोषण करते व झाडाला कमजोर करते.

..

मिली बग रोखण्यासाठी घ्या काळजी

मिली बग या किडीचे प्रमाण प्रामुख्याने शेताच्या बांधाकडील झाडावर अधिक दिसून येते. या किडीचे वेळीच नियंत्रण करायचे असेल तर क्लोरोपायरीफॉस ४० मिली २० ईसीमध्ये मिसळून तसेच बोरोफ्राईज १.५ मिली प्रत्येक लिटर फवारणी करावी. फवारणी केल्यास याचे नियंत्रण शक्य आहे.

..

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याखाली आहे. त्यामुळे मिली बगपेक्षा इतर काही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

-बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.

...

शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे

मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.

-सतीष जगताप, शेतकरी.

..

यावर्षी रोगांचा प्रादुर्भाव कमी होता. भाव वाढल्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होणार असून, नुकसानभरपाई द्यावी.

-काकासाहेब खंडागळे, शेतकरी.

..

सायोबीनचा पेरा हेक्टरमध्ये

वर्ष पेरा भाव

२०१७ ८२०००० ३२००

२०१८ ९८००० ३६००

२०१९ १२००२१ ३७००

२०२० १९८४२० ४२००

२०२१ २८४७४८ ७०००-१००००