शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला, ‘मिली बग’ने स्वप्नांचा चुराडा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:40 IST

बीड : जिल्ह्यात कापूस क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ ...

बीड : जिल्ह्यात कापूस क्षेत्रात घट होऊन सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे. मात्र, ‘मिली बग’सारख्या कीड रोगामुळे सोयाबीनचे उत्पन्न हेक्टरी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

२०१७ ते २०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनचे पेरा क्षेत्र वाढले आहे. दरवर्षी वाढत असलेला सोयाबीनचा भाव व कापूस पिकापेक्षा कमी कष्ट व खर्च लागतो, या कारणांमुळे देखील सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र हे एक लाख ९० हजार ७४८ इतके होते. त्या तुलनेत सोयाबीनचा पेरा दोन लाख ८४ हजार ९७४ हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. मात्र, ‘मिली बग’च्या प्रादुर्भावामुळे हेक्टरी उतारा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...

काय आहे मिली बग

मिली बग ही एक कीड आहे. याला मराठीत पिठ्या ढेकूण म्हणतात. हा अंडी न घालता पिलांना जन्म देतो. अंगावर लोकरीसारखे आवरण असल्याने सहसा कुठलेही कीटकनाशक या किडीच्या शरीरात प्रवेश करत नाही. जास्वंद, सीताफळ व पपई या पिकांवर प्रामुख्याने आढळतो. मिली बग ही कीड झाडातील रस शोषण करते व झाडाला कमजोर करते.

..

मिली बग रोखण्यासाठी घ्या काळजी

मिली बग या किडीचे प्रमाण प्रामुख्याने शेताच्या बांधाकडील झाडावर अधिक दिसून येते. या किडीचे वेळीच नियंत्रण करायचे असेल तर क्लोरोपायरीफॉस ४० मिली २० ईसीमध्ये मिसळून तसेच बोरोफ्राईज १.५ मिली प्रत्येक लिटर फवारणी करावी. फवारणी केल्यास याचे नियंत्रण शक्य आहे.

..

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याखाली आहे. त्यामुळे मिली बगपेक्षा इतर काही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

-बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.

...

शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे

मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.

-सतीष जगताप, शेतकरी.

..

यावर्षी रोगांचा प्रादुर्भाव कमी होता. भाव वाढल्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होणार असून, नुकसानभरपाई द्यावी.

-काकासाहेब खंडागळे, शेतकरी.

..

सायोबीनचा पेरा हेक्टरमध्ये

वर्ष पेरा भाव

२०१७ ८२०००० ३२००

२०१८ ९८००० ३६००

२०१९ १२००२१ ३७००

२०२० १९८४२० ४२००

२०२१ २८४७४८ ७०००-१००००