शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकरी आंदोलनाचा वचपा म्हणून केंद्राने खतांचे भाव वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:32 IST

माजलगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्व जण हवालदिल झालेले असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट ...

माजलगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्व जण हवालदिल झालेले असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वचपा म्हणून खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत, असा आरोप मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केला. या दरवाढीचा फटका बळीराजाला बसणार असल्याने ही वाढ तत्काळ मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोनामुळे सर्व ठप्प असताना देशाच्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने बळ दिले, अन्नधान्य, भाजीपाल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही. त्याच बळीराजाच्या जीवावर केंद्रातील राज्यकर्ते उठले आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन उभारले त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाचा वचपा म्हणून खतांची भाववाढ केली आहे. अस्मानी संकट पाचवीला पुजले असताना आता सुलतानी संकट डोक्यावर लादले आहे, अशी टीकाही डक यांनी केली. ११०० रुपयांचे डीएपी खत १९०० रुपये झाले यावरून या दरवाढीचा अंदाज लावता येईल. ६५ रुपयांचे डिझेल ९२ रुपये केल्याने मालवाहतुकीचे दर वाढले. कर्ज काढून किंवा भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चालवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना तारणार की मारणार याचा विचार केंद्रातील राज्यकर्त्यांनी करावा, असे डक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन पाठवून भाववाढ कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी डक यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना ना जीवाची, ना मालाची हमी

एकीकडे आधीच कोरोना महामारीचे संकट असताना खतांचे भाव दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होईल. सरकारने कर्मचारी व अनेकांना कोविडयोद्धा पुरस्कार जाहीर केले, विमा कवच दिले, मात्र शेतकऱ्यांना कुठलीही सुरक्षा दिली नाही. बाजारभावाची कोणतीही हमी नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे, असे डक म्हणाले.