शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

रेल्वे भूसंपादनाच्या तक्रारी आठवड्यात सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

आष्टी : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहीर, फळबाग, पाइपलाइनसारख्या बाबींची शहानिशा करून शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा. रेल्वेसह ...

आष्टी : अहमदनगर-बीड-परळी

रेल्वे मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहीर, फळबाग, पाइपलाइनसारख्या बाबींची शहानिशा करून शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा. रेल्वेसह महसूल, कृषी अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन पाहणी करून शेतकऱ्यांचा मावेजा वर्ग करावा. एका खात्याने दुसऱ्या खात्याकडे बोट न दाखवता, ठरवून दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करण्याचे निर्देश खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिले.

नगर-बीड- परळी रेल्वेमार्गासाठी संपादित जमिनीच्या मावेजासंदर्भात येथील तहसील कार्यालयात सोमवारी बैठक झाली. यावेळी आ.बाळासाहेब आजबे,माजी. आ.भीमसेन धोंडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजाभाऊ कदम, सविता, गोल्हार, ॲड.वाल्मिक निकाळजे, विजय गोल्हार, सभापती सुवर्णा लाबरूड, शंकर देशमुख, शैलेजा गर्जे, अशोक पोकळे, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, अंकुश नागरगोजे, संदीप नागरगोजे उपस्थित होते.

खा.मुंडे म्हणाल्या, फळबाग, घरे, विहिरींच्या मावेजाचे प्रश्न पुढील १ महिन्याच्या आत मार्गी लागावेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्यात बोगस नोंदी करू नयेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी तिन्ही खात्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ १५ दिवसांमध्ये मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे मार्गाचे ४४ हेक्टर भूसंपादन राहिले असून, सर्वात जास्त आष्टी तालुक्यात राहिले आहे. हा प्रश्न १५ दिवसांत मार्गी लावावा. कोरोनाच्या काळात प्रशासनावर जबाबदारी आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम लावून रेल्वे, भूसंपादन, कृषी अधिकाऱ्यांनी ऑन द स्पाॅट पाहून ८ दिवसांत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी रेल्वे ब्रीज ऑप्शन रोड हे अत्यंत निकृष्ट व लेवलमध्ये न केल्याने जाण्या-येण्याची अडचण निर्माण झाल्याची तक्रार करताच, ऑप्शन रोड दुरुस्त करण्याच्याही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या आढावा बैठकीत उपस्थित रेल्वेचे संबंधित अधिकारी मग्रुरीने बोलत असल्याचे दिसताच, त्यांना खा.मुंडे यांनी चांगलेच झापले. यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चौकट

रेल्वेसाठी नागरिकांचा विरोध नाही, काम गैरप्रकारामुळे लांबणीवर पडत आहे.

शेतकऱ्यांच्या बोगस विहिरी, फळबाग, घरांची नोंद केल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे रेल्वे येण्यासाठी वेळ लागत आहे. सोलापूरवाडीपर्यंत टेस्टिंग झाली आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेत, तत्काळ सोडविल्या, तर थोड्याच दिवसांत रेल्वेचे काम पूर्ण होईल.

- बाळासाहेब आजबे, आमदार.

रेल्वेसाठीचे भूसंपादनाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे रेल्वेचे काम रखडले आहे. आष्टीपर्यंत रेल्वे येण्यास काम जलदगतीने केल्यास अडचण नाही. शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मावेजा द्यावा.

- भीमसेन धोंडे, माजी आमदार.

रेल्वे मार्ग कामाची पाहणी

सोमवारी खा.डॉ.प्रीतम मुंडे व माजी आ.भीमसेन धोंडे यांनी अहमदनगर- बीड - परळी या रेल्वेमार्गाचे आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आष्टी (चिंचाळा) येथील रेल्वे स्टेशन कामाची पाहणी केली.

===Photopath===

280621\img-20210628-wa0312_14.jpg~280621\img-20210628-wa0273_14.jpg