शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी रविवारी रात्री अंबाजोगाईत मशाल रॅली काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, या मागणीसाठी रविवारी रात्री अंबाजोगाईत मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भाजपच्या अडेलतट्टू आणि निष्ठूर केंद्र सरकारविरोधात लाखो शेतकरी आंदोलनात रस्त्यावर उतरले. पण सरकार अजूनही बधले नाही, हे पाहून संयुक्त किसान मोर्चाने १० फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत तिन्ही कृषी कायदे व वीज विधेयक रद्द करा आणि रास्त हमीभाव देणारा कायदा संमत करा, या मागण्यांकरिता देशभर आंदोलन तीव्र करणाऱ्या अनेक कृती जाहीर केल्या आहेत.

गेल्या ८० दिवसांपासून अखंड सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या विविध सीमांवर आजवर २२८ शेतकरी शहीद झाले आहेत. रविवारी अंबाजोगाईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मशाल रॅली काढून शहिदांना आदरांजली व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बब्रुवान पोटभरे, किसान सभेचे मुरलीधर नागरगोजे, डी. वाय. एफ. आय.चे अजय बुरांडे, प्रा. सुभाष धुळे, प्रशांत मस्के, सुहास चंदनशीव, देविदास जाधव, महेश देशमुख, खय्युम शेख, भागवत जाधव, महेश देशमुख, ऊत्रेश्वर इंगोले, विशाल देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी, विद्यार्थी, युवक सहभागी झाले होते.

संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून १४ फेब्रुवारी या पुलवामा घटनेच्या दिवशी शहीद झालेल्या सैनिकांना आणि शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती मोर्चे, मशाल मार्च आणि अन्य कार्यक्रम देशभर आयोजित केले होते. याच अनुषंगाने अंबाजोगाईतही रविवारी मशाल रॅली काढण्यात आली.