शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

शासनाच्या तलावातील खासगी इंजिनचा किराया चार लाख - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST

नांदूरघाट : जून २०१९ मध्ये काही गावात काही प्रमाणात पाणीटंचाई होती. ज्या ठिकाणी वास्तवात एक टँकर चालत होते ...

नांदूरघाट : जून २०१९ मध्ये काही गावात काही प्रमाणात पाणीटंचाई होती. ज्या ठिकाणी वास्तवात एक टँकर चालत होते अशा ठिकाणी दोन ते तीन टँकर रेकॉर्डवर दाखवून गाव पुढारी व टँकर माफियांनी मलिदा लाटल्याचे गावकरी बोलू लागले आहेत.

२०१९मध्ये तालुक्यात दोनच ठिकाणी खासगी इंजिन लावून टँकर भरल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. यामध्ये या दोन गावांतील इंजिन भाडे चार लाख तीन हजार ६५० रुपये शासनाला द्यावयाचे आहेत. यातील काही रक्कम अदा झाली असून, लवकरच उर्वरित रक्कम त्या सहा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. चार लाखाच्या पुढे नुसते भाडे देण्याऐवजी शासनाचे स्वतःचे एवढ्या रकमेत इंधन जाऊन तीन इंजिन खरेदी झाले असते, परंतु तसे न करता पंचायत समितीने स्वतः स्वखर्चाने तलाव क्षेत्रात त्यामध्ये सादोळा व जिवाचीवाडी या ठिकाणी खड्डा घेऊन त्यामध्ये भाड्याने इंजिन लावले. पंचायत समितीने स्वतः पाण्याचा उद‌्भव तयार केला. मग त्यात स्वतःची मोटार किंवा इंजिन का स्थापित केले नाही. ते भाड्याने का घेतले, असा प्रश्न आहे.

जिवाचीवाडी तलाव विहिरीवर तीन शेतकऱ्यांचे इंजिन भाड्याने घेऊन पाणी टँकर भरल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये या इंजिन भाड्यापोटी जिवाचीवाडी येथील परमेश्वर उत्तम चौरे ६८,४००, उत्तम ज्ञानोबा चौरे ६८,४००, राजेंद्र रघुनाथ तांदळे ६८,४०० यांचे इंजिन भाडे झाले असून, त्यांच्या खात्यावर ही रक्कम शासन वर्ग करत आहे. सादोळा येथील तीन शेतकऱ्यांना यामध्ये शंकर गोपीचंद इंगळे ६६,१५०, अंगद हरिश्चंद्र इंगळे ६६,१५०, श्रीकांत भरत इंगळे ६६,१५० यांचे इंजिन भाड्याने होते. वास्तविक मांजरा धरण परिसरात पंचायत समितीने खड्डा घेतला व त्या खड्ड्यांमध्ये पाणी उपसून टँकरमध्ये भरण्यासाठी हे इंजिन भाड्याने होते.

पाणी आणले, पाणी नेले यातच गोंधळ

यावरून या दोन गावातून पाणी तालुक्यातील प्रत्येक टोकाला गेल्याचे दिसून येत आहे. कारण जिवाचीवाडी येथील तलाव विहिरीतून नारेवाडी, विडा, लहुरी, सारणी, आनंदगाव, शिंदी, गप्पेवाडी, तरनळी, देवगाव, कानडी माळीसह तालुक्यातील काही गावांना या ठिकाणाहून पाणीपुरवठा केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. तसेच सादोळा या ठिकाणाहून पैठण, हादगाव, उमरी, टाकळी, कळंब आंबा, केकत सारणी अशा गावांना या ठिकाणाहून टँकरद्वारे पाणी दिल्याचे समोर आले. जिवाचीवाडी परिसरात सादोळा येथून पाणी आणले तर जिवाचीवाडी परिसरातून सादोळा हद्दीपर्यंत पाणी घेऊन गेले नेमका प्रकार काय समजायचा? हे कोडे असून, प्रशासकीय यंत्रणेने ही बाब तपासून अनियमितता, गैरव्यवहारावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.