शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रिफाइंड तेलाने वाढते चरबी; घाण्याच्या तेलाला मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

पुरुषोत्तम करवा / लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच ...

पुरुषोत्तम करवा /

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच नागरिक कमी भावामुळे रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांचा पुन्हा लाकडी घाण्याचे तेल घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे.

दोन दशकांपूर्वी नागरिकांना केवळ घाण्यातून तयार झालेले करडईचेच तेल मिळत असे. हे तेल घाण्याच्या माध्यमातून तयार करण्याचे काम तेली समाजाकडून केले जात होते. त्याकाळी करडईचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या काळात तेल काढणारे घाणे मोठ्या प्रमाणावर दिसत असत. या घाण्याला एक बैल जुंपून तो दिवसभर घाण्याला फिरत असे. त्यात करडई बारीक होऊन तेल निघत असे. त्या तेलाला गरम करून खाली साचलेला गाळ काढून ते विक्री केले जात असे. त्यावेळी नागरिकांना फिल्टर नसतानाही दर्जेदार तेल मिळत असे. कालांतराने फिल्टरयुक्त तेल येऊ लागले. मशिनरीद्वारे हे तेल काढण्यात येत असल्याने व आकर्षक पॅकिंग येत असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. त्यानंतर रिफाइंड तेल बाजारात उपलब्ध झाले. त्याचा भावही कमी असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. करडई तेल महाग असल्याने घाण्याचे तेल घेणाऱ्यांची संख्या रोडावली होती.

...

रिफाइंड तेल घातक का?

सध्या बाजारात अनेक प्रकारचे तेल आल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ लागल्याने विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने डाॅक्टरांकडून चांगले तेल खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत.

....

लाकडी घाण्याच्या तेलाला पर्याय

भेसळीच्या तेलामुळे नागरिक सेंद्रिय पद्धतीने बनविले जात असलेल्या घाण्याच्या तेलाकडे वळले आहेत. हे तेल तयार करण्यासाठी आता अनेक युवक या व्यवसायाकडे वळलेले दिसत आहेत.

सध्या माजलगाव शहरात केवळ एकच घाणा सुरू असल्याने या ठिकाणी तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या अनेक ठिकाणी युवक घाण्याचे तेल तयार करून घरोघरी विक्री करताना दिसत आहेत. यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे.

.....

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

नागरिकांमध्ये सद्य:परिस्थितीत मोठ्या प्रमाणात तळीव पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात रिफाइंड तेलाचा वापर होत आहे. या तेलामुळे चरबी वाढण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत. यामुळे हृदयरोगासारखे आजार उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्जेदार तेलाचा वापर करावा, ज्यामुळे अनेक आजारांपासून नागरिक दूर राहू शकतील.

-डॉ. श्रेयश देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ, माजलगाव

....