शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

रिफाइंड तेलाने वाढते चरबी; घाण्याच्या तेलाला मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

पुरुषोत्तम करवा / लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच ...

पुरुषोत्तम करवा /

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच नागरिक कमी भावामुळे रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांचा पुन्हा लाकडी घाण्याचे तेल घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे.

दोन दशकांपूर्वी नागरिकांना केवळ घाण्यातून तयार झालेले करडईचेच तेल मिळत असे. हे तेल घाण्याच्या माध्यमातून तयार करण्याचे काम तेली समाजाकडून केले जात होते. त्याकाळी करडईचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या काळात तेल काढणारे घाणे मोठ्या प्रमाणावर दिसत असत. या घाण्याला एक बैल जुंपून तो दिवसभर घाण्याला फिरत असे. त्यात करडई बारीक होऊन तेल निघत असे. त्या तेलाला गरम करून खाली साचलेला गाळ काढून ते विक्री केले जात असे. त्यावेळी नागरिकांना फिल्टर नसतानाही दर्जेदार तेल मिळत असे. कालांतराने फिल्टरयुक्त तेल येऊ लागले. मशिनरीद्वारे हे तेल काढण्यात येत असल्याने व आकर्षक पॅकिंग येत असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. त्यानंतर रिफाइंड तेल बाजारात उपलब्ध झाले. त्याचा भावही कमी असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. करडई तेल महाग असल्याने घाण्याचे तेल घेणाऱ्यांची संख्या रोडावली होती.

...

रिफाइंड तेल घातक का?

सध्या बाजारात अनेक प्रकारचे तेल आल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ लागल्याने विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने डाॅक्टरांकडून चांगले तेल खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत.

....

लाकडी घाण्याच्या तेलाला पर्याय

भेसळीच्या तेलामुळे नागरिक सेंद्रिय पद्धतीने बनविले जात असलेल्या घाण्याच्या तेलाकडे वळले आहेत. हे तेल तयार करण्यासाठी आता अनेक युवक या व्यवसायाकडे वळलेले दिसत आहेत.

सध्या माजलगाव शहरात केवळ एकच घाणा सुरू असल्याने या ठिकाणी तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या अनेक ठिकाणी युवक घाण्याचे तेल तयार करून घरोघरी विक्री करताना दिसत आहेत. यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे.

.....

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

नागरिकांमध्ये सद्य:परिस्थितीत मोठ्या प्रमाणात तळीव पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात रिफाइंड तेलाचा वापर होत आहे. या तेलामुळे चरबी वाढण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत. यामुळे हृदयरोगासारखे आजार उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्जेदार तेलाचा वापर करावा, ज्यामुळे अनेक आजारांपासून नागरिक दूर राहू शकतील.

-डॉ. श्रेयश देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ, माजलगाव

....