शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

रिफाइंड तेलाने वाढते चरबी; घाण्याच्या तेलाला मागणी वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

पुरुषोत्तम करवा / लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच ...

पुरुषोत्तम करवा /

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : सध्या खाण्याच्या तेलात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी होताना दिसत आहेत. यातच नागरिक कमी भावामुळे रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नागरिकांचा पुन्हा लाकडी घाण्याचे तेल घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे.

दोन दशकांपूर्वी नागरिकांना केवळ घाण्यातून तयार झालेले करडईचेच तेल मिळत असे. हे तेल घाण्याच्या माध्यमातून तयार करण्याचे काम तेली समाजाकडून केले जात होते. त्याकाळी करडईचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्या काळात तेल काढणारे घाणे मोठ्या प्रमाणावर दिसत असत. या घाण्याला एक बैल जुंपून तो दिवसभर घाण्याला फिरत असे. त्यात करडई बारीक होऊन तेल निघत असे. त्या तेलाला गरम करून खाली साचलेला गाळ काढून ते विक्री केले जात असे. त्यावेळी नागरिकांना फिल्टर नसतानाही दर्जेदार तेल मिळत असे. कालांतराने फिल्टरयुक्त तेल येऊ लागले. मशिनरीद्वारे हे तेल काढण्यात येत असल्याने व आकर्षक पॅकिंग येत असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. त्यानंतर रिफाइंड तेल बाजारात उपलब्ध झाले. त्याचा भावही कमी असल्याने नागरिक याकडे आकर्षित होऊ लागले. करडई तेल महाग असल्याने घाण्याचे तेल घेणाऱ्यांची संख्या रोडावली होती.

...

रिफाइंड तेल घातक का?

सध्या बाजारात अनेक प्रकारचे तेल आल्याने व त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ लागल्याने विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने डाॅक्टरांकडून चांगले तेल खाण्याचा सल्ला दिला जात आहे.

रिफाइंडसारख्या तेलाचा वापर करीत असल्याने नागरिकांमध्ये चरबी वाढण्याचे प्रकार वाढत आहेत.

....

लाकडी घाण्याच्या तेलाला पर्याय

भेसळीच्या तेलामुळे नागरिक सेंद्रिय पद्धतीने बनविले जात असलेल्या घाण्याच्या तेलाकडे वळले आहेत. हे तेल तयार करण्यासाठी आता अनेक युवक या व्यवसायाकडे वळलेले दिसत आहेत.

सध्या माजलगाव शहरात केवळ एकच घाणा सुरू असल्याने या ठिकाणी तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या अनेक ठिकाणी युवक घाण्याचे तेल तयार करून घरोघरी विक्री करताना दिसत आहेत. यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे.

.....

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

नागरिकांमध्ये सद्य:परिस्थितीत मोठ्या प्रमाणात तळीव पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात रिफाइंड तेलाचा वापर होत आहे. या तेलामुळे चरबी वाढण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत. यामुळे हृदयरोगासारखे आजार उद्भवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्जेदार तेलाचा वापर करावा, ज्यामुळे अनेक आजारांपासून नागरिक दूर राहू शकतील.

-डॉ. श्रेयश देशपांडे, हृदयरोग तज्ज्ञ, माजलगाव

....