शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

राष्ट्रीय छात्र सेनेचे अंबाजोगाईत स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST

अंबाजोगाई : महाराष्ट्र बटालियन ५१अंतर्गत अंबाजोगाई विभागाच्या वतीने भारतीय स्वतंत्रता महोत्सव १ ते १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. भारतीय ...

अंबाजोगाई : महाराष्ट्र बटालियन ५१अंतर्गत अंबाजोगाई विभागाच्या वतीने भारतीय स्वतंत्रता महोत्सव १ ते १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्वातंत्र्यसैनिकांचे सत्कार, ध्वजारोहण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करताना छात्र सैनिकांनी स्वतंत्रता आंदोलनातील स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंदतीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या परिसरातील पुतळ्याची स्वच्छता केली. हे अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. ‘श्रममेव जयते’ या अभियानाचे नाव घेऊन स्वच्छतेचे महत्व तरुणांना पटवून देत स्वच्छता अभियान लोकचळवळ करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त अभियान तसेच श्रमदानात प्रामुख्याने ‘ओला कचरा, सुका कचरा’, कचऱ्याचे व्यवस्थापन व श्रम करताना नि:स्वार्थ सेवाभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात क्रांतिदिनी करून स्वच्छ शहर सुंदर शहर करण्याचा संकल्प करण्यात आला. एनसीसीच्या मुलांनी हातात झाडू, खराटे, टोपले घेऊन कॉलेज परिसराची स्वच्छता केली. यावेळी सर्व एनसीसी अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

110821\3022img-20210811-wa0007.jpg

राष्ट्रीय छात्र सेनेचे विध्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला