शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:40 IST

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ...

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ग्रामीण भागातही गणेश भक्तांना दुर्वा म्हणजेच हरळी या वनस्पतीसाठी भटकंती करावी लागत आहे.

पौराणिक कथेनुसार उष्ण, गरळ ओकणारा अनलासूर राक्षसाचा गणेशाने वध केला होता. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे ऋषीमुनींनी गणेशाच्या डोक्यावर दुर्वाची जुडी अर्पण केली अशी अख्यायिका आहे. परंतु, दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. डोळ्यांचे आजार, सोरायसिस, त्वचारोग, बेबी ऑईल, नागीन अशा आजारात या वनस्पतीचा उपयोग होतो. होमिओपॅथी व युनानी या पद्धतींमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. परंतु, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वनस्पती तण असल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतातील उत्पन्न कमी करते. मजुरांच्या अभावामुळे शेतकरी या वनस्पतीचे तणनाशकाद्वारे निर्मूलन करतात. तग धरून जगण्याची जिद्द या वनस्पतीमध्ये आहे.

हरळी या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रानुसार सायनाडोन डेक्लोलान नाव आहे. ही वनस्पती जगात सर्वत्र आढळते. हिला पशू आवडीने खातात. परंतु, शेतातील पिकांवर या वनस्पतीमुळे परिणाम होतो. त्यामुळेच शेतकरी तणनाशक वापरून तिचा नाश करतात. त्यामुळे ही वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.

- प्रा. एस. पी. कुलकर्णी, अंबाजोगाई.

130921\20210913_094023.jpg

दुर्वा