शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:40 IST

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ...

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ग्रामीण भागातही गणेश भक्तांना दुर्वा म्हणजेच हरळी या वनस्पतीसाठी भटकंती करावी लागत आहे.

पौराणिक कथेनुसार उष्ण, गरळ ओकणारा अनलासूर राक्षसाचा गणेशाने वध केला होता. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे ऋषीमुनींनी गणेशाच्या डोक्यावर दुर्वाची जुडी अर्पण केली अशी अख्यायिका आहे. परंतु, दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. डोळ्यांचे आजार, सोरायसिस, त्वचारोग, बेबी ऑईल, नागीन अशा आजारात या वनस्पतीचा उपयोग होतो. होमिओपॅथी व युनानी या पद्धतींमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. परंतु, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वनस्पती तण असल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतातील उत्पन्न कमी करते. मजुरांच्या अभावामुळे शेतकरी या वनस्पतीचे तणनाशकाद्वारे निर्मूलन करतात. तग धरून जगण्याची जिद्द या वनस्पतीमध्ये आहे.

हरळी या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रानुसार सायनाडोन डेक्लोलान नाव आहे. ही वनस्पती जगात सर्वत्र आढळते. हिला पशू आवडीने खातात. परंतु, शेतातील पिकांवर या वनस्पतीमुळे परिणाम होतो. त्यामुळेच शेतकरी तणनाशक वापरून तिचा नाश करतात. त्यामुळे ही वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.

- प्रा. एस. पी. कुलकर्णी, अंबाजोगाई.

130921\20210913_094023.jpg

दुर्वा