शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकांमुळे दुर्वा झाल्या दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:40 IST

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ...

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मात्र, तणनाशकांच्या वापरामुळे दुर्वा मिळणे दुर्मिळ झाले आहे. ग्रामीण भागातही गणेश भक्तांना दुर्वा म्हणजेच हरळी या वनस्पतीसाठी भटकंती करावी लागत आहे.

पौराणिक कथेनुसार उष्ण, गरळ ओकणारा अनलासूर राक्षसाचा गणेशाने वध केला होता. त्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे ऋषीमुनींनी गणेशाच्या डोक्यावर दुर्वाची जुडी अर्पण केली अशी अख्यायिका आहे. परंतु, दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. डोळ्यांचे आजार, सोरायसिस, त्वचारोग, बेबी ऑईल, नागीन अशा आजारात या वनस्पतीचा उपयोग होतो. होमिओपॅथी व युनानी या पद्धतींमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. परंतु, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वनस्पती तण असल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतातील उत्पन्न कमी करते. मजुरांच्या अभावामुळे शेतकरी या वनस्पतीचे तणनाशकाद्वारे निर्मूलन करतात. तग धरून जगण्याची जिद्द या वनस्पतीमध्ये आहे.

हरळी या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रानुसार सायनाडोन डेक्लोलान नाव आहे. ही वनस्पती जगात सर्वत्र आढळते. हिला पशू आवडीने खातात. परंतु, शेतातील पिकांवर या वनस्पतीमुळे परिणाम होतो. त्यामुळेच शेतकरी तणनाशक वापरून तिचा नाश करतात. त्यामुळे ही वनस्पती दुर्मिळ होत चालली आहे.

- प्रा. एस. पी. कुलकर्णी, अंबाजोगाई.

130921\20210913_094023.jpg

दुर्वा