शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अंत:करणात रमाई, डोक्यात भीमाई, तरच शोषणमुक्तीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST

माजलगाव : भारतीय समाज जात, धर्म, वर्ग विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता मानणाऱ्या शक्ती आज प्रबळ झालेल्या आहेत. ...

माजलगाव

: भारतीय समाज जात, धर्म, वर्ग विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता मानणाऱ्या शक्ती आज प्रबळ झालेल्या आहेत. स्त्रियांना गुलामीत ढकलण्यात येत आहे. शोषणमुक्तीची ही लढाई अंत:करणात रमाई, डोक्यात भीमाई ठेवूनच लढावी लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य प्रो.डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माजलगाव शाखेच्या वतीने सांचद् बुद्धविहार,आंबेडकर भवन येथे त्यागमूर्ती रमाई जयंतीनिमित्त डॉ. अहिरे यांचे व्याख्यान झाले. माया दयानंद स्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी डॉ. अहिरे म्हणाल्या, बहुजनांची गुलामीतून मुक्तता करण्याची लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढत होते. जगाने ज्ञानाचे प्रतीक ठरविलेल्या बॅरिस्टरांची पत्नी फाटके लुगडे नेसून डोक्यावर गोवऱ्या गोळा करीत होती. कुपोषणाने, उपचारांअभावी आपली रमेश, गंगाधर, इंदू, राजरत्न ही चार मुले मातीआड लोटली. बहुजनांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी रमाईने अनंत यातना सोसल्या. म्हणूनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढू शकल्याचे त्या म्हणाल्या.

बाबासाहेब आंबेडकर व रमाईने ज्या समतामूलक समाजाचे स्वप्न पाहिले त्याच्या विपरीत परिस्थिती आज आलेली आहे. संविधान, शिक्षण, आरक्षण, संरक्षण, न्याय संस्था, शेती, माध्यमं, सगळे धोक्यात आली आहेत. उद्योग, शिक्षणाचे खासगीकरण केले जात आहे. लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अंत:करणात रमाईची करुणा व डोक्यात भीमाई म्हणजेच बाबासाहेबांचा लढाऊबाणा ठेवावा लागेल. संघर्षाला सिद्ध व्हावे लागेल. रमाईने सामाजिक समतेसाठी दिलेल्या आहुतीला सार्थकता येईल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. मोरे, कमल डोंगरे, गुलाबराव प्रधान, बी. सी. डोंगरे, लिला उजगरे, एन. बी. राजभोज, शामराव वाघमारे, के. व्ही. साळवे, डी. ई. उजगरे, वाल्हाबाई टाकणखार, गयाबाई आव्हाड, उषा मोरे, डॉ. दिगंबर बोबडे, नगरसेवक सुदामती पौळ, उषा बनसोडे, स्वाती डोंगरे, आदींची उपस्थिती होती.

गुलाबराव धाईजे, के. व्ही. साळवे यांनी प्रास्ताविक केले. वंदना घनगाव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सिद्धार्थ वक्ते, विजय धाईजे, प्रा. शाहू घनगाव, विजय साळवे, डॉ. भागवत साळवे, डी. पी. पोटभरे, जीवन जाधव, शारदा टाकणखार, कमल मोरे, वैभव साळवे, लिला उजगरे, अँड. चेतना टाकणखार, कमल गायकवाड, आदींसह नागरिक उपस्थित होते. व्याख्यानानंतर मधुकर कदम आणि संचाचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम पार पडला.