शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

अंत:करणात रमाई, डोक्यात भीमाई, तरच शोषणमुक्तीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST

माजलगाव : भारतीय समाज जात, धर्म, वर्ग विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता मानणाऱ्या शक्ती आज प्रबळ झालेल्या आहेत. ...

माजलगाव

: भारतीय समाज जात, धर्म, वर्ग विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता मानणाऱ्या शक्ती आज प्रबळ झालेल्या आहेत. स्त्रियांना गुलामीत ढकलण्यात येत आहे. शोषणमुक्तीची ही लढाई अंत:करणात रमाई, डोक्यात भीमाई ठेवूनच लढावी लागेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य प्रो.डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभेच्या माजलगाव शाखेच्या वतीने सांचद् बुद्धविहार,आंबेडकर भवन येथे त्यागमूर्ती रमाई जयंतीनिमित्त डॉ. अहिरे यांचे व्याख्यान झाले. माया दयानंद स्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यावेळी डॉ. अहिरे म्हणाल्या, बहुजनांची गुलामीतून मुक्तता करण्याची लढाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढत होते. जगाने ज्ञानाचे प्रतीक ठरविलेल्या बॅरिस्टरांची पत्नी फाटके लुगडे नेसून डोक्यावर गोवऱ्या गोळा करीत होती. कुपोषणाने, उपचारांअभावी आपली रमेश, गंगाधर, इंदू, राजरत्न ही चार मुले मातीआड लोटली. बहुजनांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी रमाईने अनंत यातना सोसल्या. म्हणूनच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याची लढाई लढू शकल्याचे त्या म्हणाल्या.

बाबासाहेब आंबेडकर व रमाईने ज्या समतामूलक समाजाचे स्वप्न पाहिले त्याच्या विपरीत परिस्थिती आज आलेली आहे. संविधान, शिक्षण, आरक्षण, संरक्षण, न्याय संस्था, शेती, माध्यमं, सगळे धोक्यात आली आहेत. उद्योग, शिक्षणाचे खासगीकरण केले जात आहे. लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अंत:करणात रमाईची करुणा व डोक्यात भीमाई म्हणजेच बाबासाहेबांचा लढाऊबाणा ठेवावा लागेल. संघर्षाला सिद्ध व्हावे लागेल. रमाईने सामाजिक समतेसाठी दिलेल्या आहुतीला सार्थकता येईल, असे त्या म्हणाल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस. बी. मोरे, कमल डोंगरे, गुलाबराव प्रधान, बी. सी. डोंगरे, लिला उजगरे, एन. बी. राजभोज, शामराव वाघमारे, के. व्ही. साळवे, डी. ई. उजगरे, वाल्हाबाई टाकणखार, गयाबाई आव्हाड, उषा मोरे, डॉ. दिगंबर बोबडे, नगरसेवक सुदामती पौळ, उषा बनसोडे, स्वाती डोंगरे, आदींची उपस्थिती होती.

गुलाबराव धाईजे, के. व्ही. साळवे यांनी प्रास्ताविक केले. वंदना घनगाव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सिद्धार्थ वक्ते, विजय धाईजे, प्रा. शाहू घनगाव, विजय साळवे, डॉ. भागवत साळवे, डी. पी. पोटभरे, जीवन जाधव, शारदा टाकणखार, कमल मोरे, वैभव साळवे, लिला उजगरे, अँड. चेतना टाकणखार, कमल गायकवाड, आदींसह नागरिक उपस्थित होते. व्याख्यानानंतर मधुकर कदम आणि संचाचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम पार पडला.