शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अंबाजोगाईत ‘रमाई आवास योजना’ रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:35 IST

नगर परिषदेत‌ ‌प्रस्ताव धूळखात अंबाजोगाई : केंद्र व राज्य सरकार गोरगरीब व मागासवर्गीयांसाठी अनेक चांगल्या योजनांची आखणी करते. ...

नगर परिषदेत‌ ‌प्रस्ताव धूळखात

अंबाजोगाई : केंद्र व राज्य सरकार गोरगरीब व मागासवर्गीयांसाठी अनेक चांगल्या योजनांची आखणी करते. त्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देते; परंतु अशा चांगल्या योजनांची ग्राऊंड लेवलवर अंमलबजावणी होतेच असे नाही. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी असलेली ‘रमाई आवास योजना’ ही त्यापैकीच एक. अंबाजोगाई शहरातही रमाई आवास योजनेचे प्रस्ताव नगर परिषदेकडे धूळखात पडले आहेत.

भोगवट्याच्या जाचक अटीमुळे या योजनेपासून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील जनतेला ‘वंचित’ राहावे लागत आहे. भोगवट्याची जाचक अट शिथिल करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावणे आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘रमाई आवास घरकूल योजना’ सुरू करण्यात आली. सदरील योजनेची अंमलबजावणी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. या योजनेच्या अंतर्गत शहरी भागात 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना घरकूल बांधकाम करण्यासाठी ‌अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात काही प्रमाणात ही योजना यशस्वी झाली असली तरी शहरी भागात याचे प्रमाण अत्यल्प आहे. कारण शहरी भागात या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला त्याची जागा मालकी हक्कात असणे गरजेचे असते.

अंबाजोगाई शहरात अनुसूचित जातीतील आणि नवबौद्ध राहत असलेल्या बहुतांश वस्त्या या भोगवट्यात आहेत. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या पीटीआरवर भोगवटा असा उल्लेख करण्यात येतो. पीटीआरवर भोगवटा अशी नोंद असल्यामुळे रमाई आवास योजनेचा लाभ भोगवटाधारक असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे अंबाजोगाई शहरात भोगवट्याच्या जाचक अटीमुळे रमाई आवास योजनेची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे ही योजना अंबाजोगाईत नुसती कागदावरच राहिली आहे.

नगर परिषदेने समाज कल्याण विभागाकडे मागविले मार्गदर्शन

नगर परिषदेच्या वतीने २४ मार्च २१ रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, बीड यांना मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी एक पत्र पाठवले आहे. अंबाजोगाई शहरात अनुसूचित जातीतील आणि नवबौद्ध राहत असलेल्या बहुतांश वस्त्यांतील नागरिकांची नोंद ही नगर परिषदेच्या पीटीआरला भोगवट्यात आहे. अशा नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करता येतील किंवा कसे, यासंदर्भात शासन‌ नियमांच्या निकषांच्या आधारावर सुस्पष्ट मार्गदर्शन करावे, असे सदरील पत्रात म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा‌ करण्याची गरज

अंबाजोगाई शहरातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी भोगवट्याची अट जाचक ठरत आहे. ही जाचक अट शिथिल करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा‌ करण्याची गरज आहे. ही जाचक अट शिथिल झाल्यानंतर अंबाजोगाई शहरातील बहुतांश नागरिकांना ‌या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि या योजनेची अंमलबजावणीही होईल.