शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासीच नसल्याने रेल्वे आरक्षण रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बाजारपेठेप्रमाणेच बस, रेल्वेसेवेलाही बसला आहे. प्रवाशांची संख्या रोडावल्यामुळे रेल्वेचे आरक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बाजारपेठेप्रमाणेच बस, रेल्वेसेवेलाही बसला आहे. प्रवाशांची संख्या रोडावल्यामुळे रेल्वेचे आरक्षण रिकामे आहे.

परळी रेल्वेस्थानकावरून ३१ मार्च रोजी सिकंदराबाद, औरंगाबाद आणि परळीला जाणाऱ्या रेल्वेच्या आरक्षणाची माहिती घेतली असता सर्व गाड्यांचे आरक्षण रिकामे होते. परळीहून सिकंदराबादला जाणाऱ्या शिर्डी-कोईंबतूरच्या स्लीपरचे २० तर थर्ड एसीचे ८ बर्थ रिकामे होते. औरंगाबादला जाणाऱ्या कोईंबतूर -शिर्डीच्या स्लीपरचे १६ तर थर्ड एसीचे १२ बर्थ रिकामे होते. औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३४८ तर थर्ड एसीचे ३५ बर्थ रिकामे होते.

औरंगाबादहून परळीत येण्यासाठी ३१ मार्च रोजी औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३४९ तर थर्ड एसीचे ३५ बर्थ रिकामे होते. सिकंदराबादहून परळीत येण्यासाठी ३१ मार्च रोजी कोईंबतूर-शिर्डी गाडीचे स्लीपरचे १४ तर थर्ड एसीचेही बर्थ रिकामे होते. तसेच औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३१३ तर थर्ड एसीचे ३३ बर्थ रिकामे होते.

उन्हाळ्याच्या सुटीतील १५ एप्रिल २१ रोजीची माहिती घेतली असता परळीतून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षणही रिकामेच होते.

औरंगाबादसाठी नो वेटिंग, हैदराबादसाठी नो वेटिंग

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची संख्या रोडावली आहे. परळी परिसरातील रेल्वे प्रवाशांचा संपर्क जास्तीत जास्त औरंगाबाद, पुणे, हैदराबाद शहरासाठी येतो. या शहरासाठी जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण रिकामेच आहे.

परीक्षेनंतर रिकामेच

सर्वसाधारणपणे सर्व परीक्षा ह्या एप्रिलमध्ये संपूण जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्यासाठी बस आणि रेल्वेंना तुफान गर्दी असते. दुसरे म्हणजे लग्नसराईचा हा काळ असतो. कोरोनामुळे विवाहातील गर्दीस प्रतिबंध घातल्यामुळे विवाह देखील अतीशय साधेपणाने होत आहेत. पर्यायाने रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

पनवेल- नांदेड,. नांदेड - पनवेल या परळी मार्गे धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी गाड्या भिगवन येथे चालू असलेल्या कामा मुळे ३१ मार्चपर्यंत बंद आहेत ३१ मार्च नंतर ही रेल्वे सुरू होणार आहे. सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही चालू झाल्या नाहीत व आहे त्या गाड्यांना प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

रोज १० रेल्वे

n परळी मार्गे शिर्डी- काकीनाडा

n काकीनाडा शिर्डी,

n बंगळरू-नांदेड,

n नांदेड- बंगळरू

n औरंगाबाद- हैद्राबाद

n हैदराबाद- औरंगाबाद

n पनवेल- नांदेड

n नांदेड-पनवेल

n कोल्हापूर- धनबाद

n धनबाद -कोल्हापूर

सद्या पनवेल-नांदेड-पनवेल बंद आहे.

===Photopath===

240321\24bed_18_24032021_14.jpg

===Caption===

प्रवासीच नसल्याने रेल्वे आरक्षण रिकामेच