शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

प्रवासीच नसल्याने रेल्वे आरक्षण रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बाजारपेठेप्रमाणेच बस, रेल्वेसेवेलाही बसला आहे. प्रवाशांची संख्या रोडावल्यामुळे रेल्वेचे आरक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बाजारपेठेप्रमाणेच बस, रेल्वेसेवेलाही बसला आहे. प्रवाशांची संख्या रोडावल्यामुळे रेल्वेचे आरक्षण रिकामे आहे.

परळी रेल्वेस्थानकावरून ३१ मार्च रोजी सिकंदराबाद, औरंगाबाद आणि परळीला जाणाऱ्या रेल्वेच्या आरक्षणाची माहिती घेतली असता सर्व गाड्यांचे आरक्षण रिकामे होते. परळीहून सिकंदराबादला जाणाऱ्या शिर्डी-कोईंबतूरच्या स्लीपरचे २० तर थर्ड एसीचे ८ बर्थ रिकामे होते. औरंगाबादला जाणाऱ्या कोईंबतूर -शिर्डीच्या स्लीपरचे १६ तर थर्ड एसीचे १२ बर्थ रिकामे होते. औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३४८ तर थर्ड एसीचे ३५ बर्थ रिकामे होते.

औरंगाबादहून परळीत येण्यासाठी ३१ मार्च रोजी औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३४९ तर थर्ड एसीचे ३५ बर्थ रिकामे होते. सिकंदराबादहून परळीत येण्यासाठी ३१ मार्च रोजी कोईंबतूर-शिर्डी गाडीचे स्लीपरचे १४ तर थर्ड एसीचेही बर्थ रिकामे होते. तसेच औरंगाबाद फेस्टीव्हल गाडीचे स्लीपरचे ३१३ तर थर्ड एसीचे ३३ बर्थ रिकामे होते.

उन्हाळ्याच्या सुटीतील १५ एप्रिल २१ रोजीची माहिती घेतली असता परळीतून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षणही रिकामेच होते.

औरंगाबादसाठी नो वेटिंग, हैदराबादसाठी नो वेटिंग

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची संख्या रोडावली आहे. परळी परिसरातील रेल्वे प्रवाशांचा संपर्क जास्तीत जास्त औरंगाबाद, पुणे, हैदराबाद शहरासाठी येतो. या शहरासाठी जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण रिकामेच आहे.

परीक्षेनंतर रिकामेच

सर्वसाधारणपणे सर्व परीक्षा ह्या एप्रिलमध्ये संपूण जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्यासाठी बस आणि रेल्वेंना तुफान गर्दी असते. दुसरे म्हणजे लग्नसराईचा हा काळ असतो. कोरोनामुळे विवाहातील गर्दीस प्रतिबंध घातल्यामुळे विवाह देखील अतीशय साधेपणाने होत आहेत. पर्यायाने रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

पनवेल- नांदेड,. नांदेड - पनवेल या परळी मार्गे धावणाऱ्या रेल्वे प्रवाशी गाड्या भिगवन येथे चालू असलेल्या कामा मुळे ३१ मार्चपर्यंत बंद आहेत ३१ मार्च नंतर ही रेल्वे सुरू होणार आहे. सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही चालू झाल्या नाहीत व आहे त्या गाड्यांना प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

रोज १० रेल्वे

n परळी मार्गे शिर्डी- काकीनाडा

n काकीनाडा शिर्डी,

n बंगळरू-नांदेड,

n नांदेड- बंगळरू

n औरंगाबाद- हैद्राबाद

n हैदराबाद- औरंगाबाद

n पनवेल- नांदेड

n नांदेड-पनवेल

n कोल्हापूर- धनबाद

n धनबाद -कोल्हापूर

सद्या पनवेल-नांदेड-पनवेल बंद आहे.

===Photopath===

240321\24bed_18_24032021_14.jpg

===Caption===

प्रवासीच नसल्याने रेल्वे आरक्षण रिकामेच