शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST

धारूर : आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले असून, ग्रामस्थांनी फटाके वाजवून ...

धारूर : आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले असून, ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. राज्यात गाव आदर्श करण्याचा संकल्प सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त केला आहे.

राज्य शासनाच्या वतीने राज्यात जिल्हास्तरावर ग्रामपंचायतीसाठी राबविल्या जाणाऱ्या आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम करून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून २० लक्ष रुपयांचा पुरस्कार मिळविला होता. जिल्हास्तरीय तपासणीतदेखील आवरगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. ग्रामस्थांनी एकत्रित येत सरपंच अमोल जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावाचा चेहरामोहरा बदलला असून, ग्रामस्थांना सर्व सुविधा दिल्या आहेत. आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने गावाला ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

पंचायत समितीचे सभापती हनुमंत नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, विस्तार अधिकारी अनिल चौरे यांनी या यशाबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

राज्यात आदर्श गाव करण्याचा संकल्प

आर. आर. पाटील ग्रामस्वच्छता स्पर्धेत आवरगाव ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने व सहकार्यामुळे हे यश मिळाले असून, विकासकामांतून गावाचा चेहरामोहरा बदलून राज्यात आदर्श गाव करण्याचा संकल्प असल्याचा मनोदय सरपंच अमोल जगताप यांनी व्यक्त केला.