शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : उन्हाळ्यात स्वस्त मिळणारा भाजीपाला आता पावसाळी वातावरणामुळे महाग झाला आहे. यातच डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले ...

बीड : उन्हाळ्यात स्वस्त मिळणारा भाजीपाला आता पावसाळी वातावरणामुळे महाग झाला आहे. यातच डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. महागाई आवाक्याबहेर जात असल्याने सामान्य कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. पावसाळ्यात नेहमी भाज्यांचे दर वाढतेच राहिले आहेत. उघडीप मिळेपर्यंत आणि बाजारात चांगली आवक होईपर्यंत चढे भाव राहणार आहेत. यातच आगामी श्रावणातील सण, उत्सवामुळे आणि डाळींच्या साठवणुकीबाबतच्या नियमांमुळे येत्या काही दिवसात डाळींचे दर भडकणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे इतर डाळींच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या मसूर डाळीचा वापर वाढत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

डाळींचे दर (प्रती किलो)

हरभरा - ७०

तूर - १००

मूग - १००

उडीद -१००

मसूर - ७५

२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)

बटाटा -२०

कांदा - २०

टोमॅटो - ३०

काकडी - २०

दोडके - ६०

गवार - ६०

शेवगा -१००

लिंबू - २०

कोथिंबीर जुडी -२०० रुपये शेकडा

पालक जुडी - २०० रुपये शेकडा

मेथी जुडी- ४०० रुपये शेकडा

म्हणून डाळ महागली

मेपर्यंत डाळींचे भाव १० ते २० रुपये किलोपर्यंत वाढले होते. ते जूनमध्ये उतरले आहेत. मात्र तरीही डाळींचे भाव १०० रुपये किलाेपर्यंत आहेत.

आयात धोरण, साठवणुकीबाबत मर्यादा, वाहतूक दरवाढीमुळे काही अंशी भाववाढ झाली. पर्याय व बदल म्हणून मसूर डाळीचा वापर वाढला असला तरी तूर, मूग, हरभरा डाळींनाच चांगली मागणी आहे. स्टॉक मर्यादेचा डाळींच्या दरावर परिणाम होणार नाही, आगामी सणासुदीतही हेच भाव राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी गंगाबिशन करवा म्हणाले.

म्हणून भाजीपाला कडाडला

लॉकडाऊन काळातही पुरेशा प्रमाणात भाज्यांची आवक होती. त्यामुळे दर स्वस्त होते. उघडीप नसल्याने व रिपरिप पावसामुळे भाज्यांची तोडणी करण्यास अडथळे येत आहेत. ठोक बाजारात सध्या आवक कमी आहे. तसेच बाहेरगावाहून वाहतुकीद्वारे फळभाज्या आणाव्या लागतात. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे भाजी विक्रेता हुजेब बागवान यांनी सांगितले.

सर्वसामान्यांचे हाल

गॅसच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. यातच भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत आहेत. व्यापार, व्यवहारांवर आधीच कोरोनाचा परिणाम झाल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. -- शुभांगी भरडे, गृहिणी, बीड.

-----------

मागील वर्षापासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांच्या गरजेच्या व जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवायला हवेत. रोजच्या आहारात तूर, हरभरा व मूग डाळीचाच वापर केला जातो. त्यामुळे मसूर डाळ स्वस्त असली तरी कमी प्रमाणातच वापरतो. - अर्चना राठौर, गृहिणी, बीड.

----------