शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्ध गाव, समृद्ध संवाद’ स्पर्धा; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला गावांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

आष्टी : पाणी फाऊंडेशनने ‘समृद्ध गाव, समृद्ध संवाद’ स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात आष्टी ...

आष्टी : पाणी फाऊंडेशनने ‘समृद्ध गाव, समृद्ध संवाद’ स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात आष्टी तालुक्यातील आठ गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी या गावांचे सरपंच, उपसरपंच, जलमित्र, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक उपस्थित होते.

संतोष शिनगारे यांनी सुरुवातीला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘वॉटर कप ते समृद्ध गाव’ स्पर्धेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी उपस्थित ग्रामस्थांचा परिचय करून घेतानाच त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या व आतापर्यंत गावात झालेल्या कामांबद्दलची माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नरेगा कृती आराखडा व काही कामे वाढवून पुरवणी कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. तसेच वॉटर बजेटमधील तूट भरून काढण्यासंदर्भात, ई-पीक पाहणी पद्धतीबदल सविस्तर माहिती दिली व त्यानुसार आपल्या गावातील शेतात जाऊन सर्वांनी आपले पिके त्या अप्लिकेशनमध्ये नोंदवावी, असे आवाहन केले.

गावातील राहिलेली जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यास सांगितले. तलावातील गाळ काढण्यासाठी, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी, बांधबंदिस्ती करण्यासाठी प्रशासनाकडून जेसीबी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताना ग्रामस्थांनी केवळ डिझेलची व्यवस्था करावी, असे सांगितले.

याच अनुषंगाने अर्ज प्रस्ताव नरेगा विभागात द्यावेत. सराटेवडगाव येथे ५ हजार रोपांची लागवड केेली असून, सालेगावने १४ हजार रोपे लावून त्याची चांगली निगा राखल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. शेरी ग्रामपंचायतीने श्रमदानातून गावातील गट-तट नष्ट केले व मनसंधारणातून जलसंधारण व जलसंधारणाच्या माथ्यावरच्या उपसचराबरोबरच गावातील लोकांच्या मनावर व माथ्यावर उपचार करून शेरी बु. गाव बिनविरोध केल्याबद्दल जिल्ह्यधिकाऱ्यांनी शेरी बु. गावाचे अभिनंदन केले.

अनेक गावातील टँकर बंद झाले असून, फळबागांचे क्षेत्रही वाढल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. पोखरा योजनेतून लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत, अशाही सूचना जिल्ह्यधिकाऱ्यांनी केल्या. प्रत्येक पिकनिहाय फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, तालुका समन्वयक कैलास पन्हाळकर व झुंबर पिंपळकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. नवीन वर्षात पदार्पण करताना एक सकारात्मक शक्ती, ऊर्जा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही घेत आल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली व याची फलश्रुती आपल्याला लवकरच आम्ही कामातून दाखवून देऊ, असे सांगितले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत चांगले काम केले. गाव पाणीदार झाल्यानंतर जेवढा आनंद आम्हाला झाला, तेवढाच आनंद आज तीन तास जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनातून झाला, असे मत जलमित्रांनी व्यक्त केले.