शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

प्रीतम मुंडे की बजरंग सोनवणे? राजकीय वर्तुळात रंगताहेत गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:05 IST

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली.

ठळक मुद्दे३ टक्क्यांनी कमी मतदान; पण १ लाख १६ हजार २७१ मतांची वाढ

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही बीड मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत २०१४च्या तुलनेत जवळपास तीन टक्क्याने घट झाली. त्यामुळे घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.बीडमध्ये २००९ मध्ये ६५.६० टक्के, २०१४ मध्ये ६८.७५ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या तुलनेत यावेळी तीन टक्के कमी मतदान झाले. असे असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाच्या आकड्याचा विचार करता बीडमध्ये १ लाख १६ हजार २७१ एवढे अधिकचे मतदान झाले आहे.विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासाभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बीडमधील मतांची टक्केवारी घटल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये १७ लाख ९२ हजार ६५० मतांपैकी १२ लाख ३२ हजार २०२ मतदारांनी (६८.७५ टक्के ) मतदान केले होेते. यावेळी २० लाख ४१ हजार १८१ मतदारांपैकी १३ लाख ४८ हजार ४७३ मतदारांनी (६६.०६ टक्के ) हक्क बजावला. यावेळी जवळपास दोन लाख नवमतदारांची संख्या वाढली होती. २०१४ च्या निवडणुकीत मोदी फॅक्टर असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला होता. यावेळी तसे काही नव्हते. बीड मतदार यादीत काही प्रमाणात घोळ होता. अनेकांची नावेच गहाळ होती. काहींच्या नावात त्रुटी होत्या. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती, पारा ४२ वरून ३८ अंशापर्यंत घसरला होता. उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी थोडीफार वाढली.बीडमध्ये भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ.प्रीतम मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, वंचित आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह ३६ उमेदवार रिंगणात होते. शेवटच्या टप्प्यात प्रचार जातीपातीवर आला. सोशल मीडियावरून तर अतिशय खालच्या पातळीवर पोस्ट टाकून प्रचार झाला होता. या जातीय प्रचाराचा दोन्हीही उमेदवारांना फटका बसला.मागच्या निवडणुकीत भाजपला झाला फायदा२००९च्या तुलनेत २०१४मध्ये ३.१५ टक्के मतदान वाढले होते. या वाढीव मतदानाचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून आले होते. यंदाची घट कोणासाठी घातक ठरते ते बघावे लागेल.कुठे मोजणी?सर्व टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. एमआयडीसी परिसरातील बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहा गोदामात ही मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान