शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

माजलगाव उपविभागात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST

माजलगाव : येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे माजलगाव उपविभागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. पाहिजे तसा पाऊस ...

माजलगाव : येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे माजलगाव उपविभागात सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे. पाहिजे तसा पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकरी तर उखाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वीज वितरण कंपनीच्या माजलगाव उपविभागात माजलगाव शहरासह ९० गावे, वस्ती, तांडे येतात. या उपविभागात वीज बिल भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मागील अनेक वर्षांपासून माजलगाव शहरात लोडशेडिंग बंद आहे. परंतु, मागील एक दीड वर्षाच्या कार्यकाळात कोरोनामुळे वीज बिल भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती.

उन्हाळ्यातही या ठिकाणचा वीज पुरवठा क्वचित खंडित झाल्याने नागरिकांना उन्हाळा जाणवला नाही. एक महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाली. चार थेंबही आले की, दिवस दिवस वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने व शेतात ऊस उभा असल्याने तसेच खरिपाचा पेरा शेतकऱ्यांनी केल्याने व पाऊस पाहिजे तसा नसल्याने शेतकऱ्यांवर पिकाला पाणी देण्याची वेळ आली आहे. पाहिजे तसा पाऊस नसल्याने सध्या वातावरणात उकाडादेखील वाढला आहे. यातच डासांचा उपद्रव वाढला आहे.

माजलगाव शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार बंद होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः या उकाड्यामुळे वृद्ध व बालक जास्त त्रस्त झाले आहेत. परंतु येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार होत असलेला बिघाड वेळेत निघत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

----

या महिन्यात वारंवार हवा व पाऊस येत असल्यामुळे वारंवार तारा तुटणे व इतर बिघाड होत आहेत. त्यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ते सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

-- सी. एम. चौधरी, कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी माजलगाव शहर