शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरणात मुलभूत बदलाची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे भविष्यकाळाचा वेध घेणारे असून, त्यात मूल्याधारित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे भविष्यकाळाचा वेध घेणारे असून, त्यात मूल्याधारित मुलभूत बदल घडविण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. भीष्मा रासकर यांनी आपल्या शोधनिबंध वाचनातून केले.

जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील महिला महाविद्यालयात आयोजित ‘शोधनिबंध वाचन’ कार्यक्रमात प्रा. डॉ. रासकर यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या.

नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती, परंपरा व मातृभाषेला महत्त्व देत ललित कलांना अधिक वाव दिला आहे. त्यामुळे विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त वाव मिळणार असल्याचे प्रा. डॉ. रासकर म्हणाले. प्राचार्य डॉ. कांचन परळीकर म्हणाल्या, या शैक्षणिक धोरणाचे फायदे व नुकसान हे अंमलबजावणीनंतरच लक्षात येतील. आगामी काळ हा नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे आपण भविष्यकाळाचा वेध घेऊन त्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम असले पाहिजे. ‘नवीन शैक्षणिक धोरण -२०२०’ या विषयावर झालेल्या चर्चेमध्ये प्रा. राजाभाऊ चव्हाण, प्रा. बापू घोक्षे, प्रा. डॉ. संगीता आहेर, प्रा. रामहरी काकडे, प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड व प्रा. डॉ. संजय भेदेकर यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांना प्रा. डॉ. भीष्मा रासकर यांनी उत्तरे दिली. प्रा. डॉ. कालिदास चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. रामहरी काकडे यांनी केले तर प्रा. डॉ. दत्ता तंगलवाड यांनी आभार मानले.