शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर ; आरोग्य विभागाकडून ना संपर्क, ना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचेही उदारहरणे आहेत. असे असले तरी एकदा रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रुग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानेच पोस्ट कोविडमुळेही रुग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही १५ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट समाधानकारक असला तरी यातील काही रुग्णांना घरी गेल्यावरही थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहेत. अगोदरच कोरोनामुळे घाबरलेले हे रुग्ण रुग्णालयात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागानेच आशा, अंगणवाडीताई यांच्यामार्फत या रुग्णांशी संपर्क साधण्याची गरज आहे. यामुळे त्यांना आधार मिळेल.

ई-संजीवनीचा लाभ घ्या

राज्यात सर्वत्र घरबसल्या उपचार घेण्यासाठी शासनाने ई-संजीवनी ही वेबसाईट व ॲप तयार केले आहे. याच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत नागरिक घरूनच मेसेज करून उपचार घेऊ शकतात. आजार गंभीर असेल तर तात्काळ जवळच्या आरोग्य संस्थेत जाण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाकाळात ही वेबसाईट जास्त लाभदायक ठरली होती.

ओपीडी सुरू करणार

पोस्ट कोविड रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू करीत आहोत. तसेच ज्यांना लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी ई-संजीवनीमार्फत सेवा देण्याचा विचार केला जात आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची माहिती घेत नाहीत. लक्षणे असतील तर उपचार केले जातात.

- डॉ.सूर्यकांत गित्ते

जिल्हा शल्य चिकित्सक, बीड