शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

पोस्ट कोविड रुग्ण वाऱ्यावर ; आरोग्य विभागाकडून ना संपर्क, ना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी आढळत आहे. असे असले तरी कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांना विविध आजार होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांचा घरी गेल्यावर मृत्यू झाल्याचेही उदारहरणे आहेत. असे असले तरी एकदा रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडला की, त्याच्याशी कसलाही संपर्क साधला जात नाही. तसेच तपासणीही केली जात नाही. त्यामुळे हे रुग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यानेच पोस्ट कोविडमुळेही रुग्ण दगावत आहेत. यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही १५ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट समाधानकारक असला तरी यातील काही रुग्णांना घरी गेल्यावरही थकवा, खोकला, तोंडाला चव न येणे अशी लक्षणे जाणवत आहेत. अगोदरच कोरोनामुळे घाबरलेले हे रुग्ण रुग्णालयात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागानेच आशा, अंगणवाडीताई यांच्यामार्फत या रुग्णांशी संपर्क साधण्याची गरज आहे. यामुळे त्यांना आधार मिळेल.

ई-संजीवनीचा लाभ घ्या

राज्यात सर्वत्र घरबसल्या उपचार घेण्यासाठी शासनाने ई-संजीवनी ही वेबसाईट व ॲप तयार केले आहे. याच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत नागरिक घरूनच मेसेज करून उपचार घेऊ शकतात. आजार गंभीर असेल तर तात्काळ जवळच्या आरोग्य संस्थेत जाण्याचा सल्ला दिला जातो. कोरोनाकाळात ही वेबसाईट जास्त लाभदायक ठरली होती.

ओपीडी सुरू करणार

पोस्ट कोविड रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू करीत आहोत. तसेच ज्यांना लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी ई-संजीवनीमार्फत सेवा देण्याचा विचार केला जात आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची माहिती घेत नाहीत. लक्षणे असतील तर उपचार केले जातात.

- डॉ.सूर्यकांत गित्ते

जिल्हा शल्य चिकित्सक, बीड