शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

बीडमध्ये गरिबांचा बर्गर कुठे स्वस्त कुठे महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:11 IST

बीड : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने गरिबांचा बर्गर असणारा वडापाव शहरात काही ठिकाणी महाग झाला ...

बीड : मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने गरिबांचा बर्गर असणारा वडापाव शहरात काही ठिकाणी महाग झाला आहे. तर काही ठिकाणी आधी होते तेच दर स्थिर आहेत. शहरातील हॉटेलमध्ये सकाळी पुरी- भाजी, उपमा, शिरा आणि भजी, जिलेबी ग्राहक चवीने खातात. तर सायंकाळी कचोरी, समोसा, रगडा पॅटिस, दाबेली, पाव भाजीची चव चाखतात; मात्र सर्वाधिक ग्राहकांचा वडापाव खाण्याकडे कल आहे. अनेक जण हौसेपोटी वडापाव खरेदी करतात तर काहीजण वडापाव खाऊनच दिवस काढतात. मात्र मागील तीन-चार महिन्यांपासून गॅस, खाद्यतेल, बटाट्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झाल्याने वडापाव विक्रेत्यांनी आकार कमी करून दर मात्र स्थिर ठेवले आहे. तर काही विक्रेत्यांनी दिवसभराचा खर्च पाहता महागाईमुळे वडापाव, भजीचे दर वाढविले आहे. बीडमध्ये १० रुपयांना मिळणाऱ्या दोन वडापावची प्लेट मागील तीन वर्षांपासून १५ रुपये आहे. तर भजी प्लेट किंवा समोसा दहा रुपयांना मिळतो; मात्र दर शहरातील ठराविक भागातच आहेत. इतर भागात मात्र वडापावची प्लेट २० रुपयांना तर भजीप्लेट १५ रुपयांना विकली जाते.

१) म्हणून महागला वडापाव

वडापाव, कचोरी किंवा समोसासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरांत चांगलीच वाढ झाली आहे. १५ किलो तेलाचा डबा दोन हजाराला मिळत होता. तो आता २३०० च्या पुढे गेला आहे. बेसनाचे भाव ७० रुपये किलोवरून ९० रुपये झाले. बटाटे १५ वरून २० रुपये तर गॅस सिलिंडरला १७०० रुपये मोजावे लागतात. आचारी, कामगारांसह इतर खर्च पाहता विक्रेत्यांना वडापाव किंवा भजी, समोसा कचोरीचे भाव वाढवावे लागले आहेत.

२) वडापावशिवाय दिवस जाणे कठीण

कामासाठी सकाळी गावाकडून बीडमध्ये येतो. भूक लागल्यावर कमी पैशात मिळणारा वडापाव नेहमी खातो. इतर पदार्थांचे दर परवडत नाही. वडापाव खाऊनच भूक भागवतो. दिवस काढतो. गावी गेल्यानंतरच जेवण करतो. -- अभिमान चिरके, आनंदवाडी.

------------

वडापाव खाऊनच अनेक जण आपले दैनंदिन कामकाज करत असतात. त्यांना मिळणारा रोजगार पाहता वडापाव त्यांची भूक भागविणारा पदार्थ आहे. जेवण किंवा नाष्टा किंवा इतर पदार्थांचे दर जास्त असून या तुलनेत वडापाव स्वस्त आहे. -- सिद्धेश्वर राऊत, बीड.

३) कोरोनाचा मोठा फटका

तेल, गॅस, बेसनचे भाव वाढले आहेत. तरीही नफ्यात घट करून आम्ही वडापावचे दर स्थिर ठेवले आहेत. एकूण खर्च परवहत नाही, परंतू जोडलेला ग्राहकही तोडता येत नाही. अनलॉकनंतर ग्राहकही कमीच आहेत. -- अर्जुन कदम, वडापाव विक्रेता, बीड.

---------

कोरोनामुळे आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. ग्राहक आहेत पण कमी प्रमाणात असल्याने दिवसभराचा व्यवसाय कमी झाला आहे. महागाईमुळे भाव वाढविणे सध्यातरी जोखमीचे ठरेल. त्यामुळे वडापावचे भाव आमच्या भागात कमी आहेत.