शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बीडमध्ये १६२ पैकी १५७ ग्रा.पं.साठी शांततेत मतदान; पाच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:49 IST

पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दूसºया टप्प्यात जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत १६४ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे १४८८ सरपंच व सदस्यांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष मतदान मंगळवारी झाले. सकाळी सात वाजेपासूनच केंद्रांवर हक्क बजावण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. दरम्यासन, या निवडणुकीत चार ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. तर दोन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत.नेकनूरमध्ये गोंधळबीड तालुक्यातील नेकनुर येथील मतदान केंद्रावरील एका मशीनमध्ये सकाळी बिघाड झाली होती. त्यानंतर तात्काळ निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी धाव घेत यंत्र दुरूस्त करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. दरम्यानच्या काळात थोडा गोंधळ उडाला होता. तसेच धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे संथगतीने प्रक्रिया चालल्याने रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते तर भोगलवाडी, हिंगणा येथे मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच आडसमध्येही उशिरापर्यंत मतदान सुरू होते.आष्टीत जास्तमतदानआष्टी तालुक्यात चार ग्रा.पं.साठी सार्वाधिक ८१ टक्के (दुपारी साडेतीन पर्यंत) मतदान झाले. तर धारूर तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी केवळ ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण ६९.३७ टक्के एवढे मतदान झाले होते.तरूणांचा उत्साहआपला हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाºया तरूणांची गर्दी दिसून आली. त्यांचा उत्साह चेहºयावर स्पष्ट दिसत होता. तर वृद्धांनीही नातेवाईकांचा आधार घेत मतदान केले.चोख बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी प्रत्येक केंद्राचा आढावा घेत होते.