शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

बीडमध्ये १६२ पैकी १५७ ग्रा.पं.साठी शांततेत मतदान; पाच बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:49 IST

पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दूसºया टप्प्यात जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत १६४ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे १४८८ सरपंच व सदस्यांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष मतदान मंगळवारी झाले. सकाळी सात वाजेपासूनच केंद्रांवर हक्क बजावण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. दरम्यासन, या निवडणुकीत चार ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. तर दोन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत.नेकनूरमध्ये गोंधळबीड तालुक्यातील नेकनुर येथील मतदान केंद्रावरील एका मशीनमध्ये सकाळी बिघाड झाली होती. त्यानंतर तात्काळ निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी धाव घेत यंत्र दुरूस्त करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. दरम्यानच्या काळात थोडा गोंधळ उडाला होता. तसेच धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे संथगतीने प्रक्रिया चालल्याने रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते तर भोगलवाडी, हिंगणा येथे मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच आडसमध्येही उशिरापर्यंत मतदान सुरू होते.आष्टीत जास्तमतदानआष्टी तालुक्यात चार ग्रा.पं.साठी सार्वाधिक ८१ टक्के (दुपारी साडेतीन पर्यंत) मतदान झाले. तर धारूर तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी केवळ ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण ६९.३७ टक्के एवढे मतदान झाले होते.तरूणांचा उत्साहआपला हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाºया तरूणांची गर्दी दिसून आली. त्यांचा उत्साह चेहºयावर स्पष्ट दिसत होता. तर वृद्धांनीही नातेवाईकांचा आधार घेत मतदान केले.चोख बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी प्रत्येक केंद्राचा आढावा घेत होते.