शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

राजकीय पुढाऱ्यांनी हेवेदावे सोडून पंतप्रधानांची भेट घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता घटनादुरुस्ती आणि वटहुकूम हेच पर्याय आहेत. मराठा समाजाला न्याय द्यायचे ...

बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता घटनादुरुस्ती आणि वटहुकूम हेच पर्याय आहेत. मराठा समाजाला न्याय द्यायचे काम पंतप्रधानांनी करावे, राज्यातील सर्व खासदारांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे ५८ मोर्चे जगाने बघितले आहेत. आता पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज नाही. कोरोनाचा काळ आहे, परिस्थिती गंभीर आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. समाजाने नव्हे तर आता लोकप्रतिनिधींनी बोलण्याची गरज आहे, असे खा. संभाजीराजे भोसले यांनी बीडमध्ये म्हटले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खा. संभाजीराजे भोसले सध्या जनसंवाद दौऱ्यावर आहेत. शनिवारी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश होता. आता मराठा आरक्षणासाठी केंद्राने आणि राज्याने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. मी शिव आणि शाहूचा वारसदार आहे. अठरापगड जाती बहुजन समाजाला एकत्रित ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही, माझा छत्रपती घराण्यात जन्म झाला हाच माझा मोठा बहुमान आहे. सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी हेवेदावे सोडून योग्य मार्ग काढण्यासाठी एकत्रित यावे, गायकवाड-भोसले समितीने काढलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात याव्यात. राज्यपालांना विनंती करून त्यांनी राष्ट्रपतींना शिफारस केली तर ३४२ (अ) च्या माध्यमातून केंद्रीय मागास वर्ग आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोग यांनी एकत्रित अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावे, राष्ट्रपतींना तो अहवाल योग्य वाटला तर तो पार्लमेंटकडे पाठवता येईल आणि वटहुकूम काढता येईल, असे खा. संभाजीराजे भोसले म्हणाले.